नाशिक विभागाच्या आढावा बैठकीनिमित्त शुक्रवारी (दि.31) अजित पवारांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, भाजप-शिवसेना युती सरकारच्या कार्यकाळात फडणवीसांनी आपल्या नागपूर जिल्ह्याला 237 कोटी रुपये अतिरिक्त देऊन राज्यातील इतर जिल्ह्यांवर अन्याय केला. फडणवीसांनी सत्तेचा गैरवापर केला आहे. परंतु, आता निधी वापराच्या सूत्रानुसार प्रत्येक जिल्ह्याला निधी देण्यात येईल. त्यामुळे कोणावर अन्याय होण्याचा प्रश्नच उद्भवणार नाही. प्रत्येक जिल्ह्याची लोकसंख्या, ग्रामीण भाग, क्षेत्रफळ आणि मानव विकास निर्देशांक या चार गोष्टींच्या आधारे जिल्ह्याला नियतव्यय देण्याचे सूत्र ठरले आहे. त्यानुसार जिल्हा नियोजन समितीमार्फत निधी देण्याचे नियोजन सुरु असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, आमदार अॅड. माणिकराव कोकाटे, दिलीप बनकर, विभागीय आयुक्त राजाराम माने, जिल्हाधिकारी सूरज मांढरे उपस्थित होते.