घरमहाराष्ट्रनाशिकविसर्ग वाढल्यानं गोदावरीला पूर, नदीकाठची दुकानं सुरक्षित ठिकाणी हलवली

विसर्ग वाढल्यानं गोदावरीला पूर, नदीकाठची दुकानं सुरक्षित ठिकाणी हलवली

Subscribe

नाशिक शहराला पाणीपुरवठा करणारं गंगापूर धरणातला जलसाठा ९८ टक्क्यांवर पोहोचला

आठवडाभरापासून सुरू असलेल्या पावसामुळे नाशिक शहराला पाणीपुरवठा करणारं गंगापूर धरणातला जलसाठा ९८ टक्क्यांवर पोहोचल्याने जलसंपदा विभागाने कालपासून विसर्ग सुरू केलाय. त्यामुळे गोदावरीला पूर आला आहे.

जलस्तर वाढल्यानं रामकुंड परिसरासह नदीपात्रातली काही मंदिरंही पाण्याखाली गेलीत. हवामान विभागानं दोन दिवस मुसळधार पावसाचा अलर्ट दिल्यानं विसर्ग वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे नदीकाठच्या लोकांनाही सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. दरम्यान, गोदावरीला आलेल्या पुरामुळे व्यावसायिकांनी नदीकाठची दुकानं सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित केली. आज पावसाने उघडीप दिल्यानं गोदावरीचा पूर कमी होण्याची शक्यता वर्तवली जातेय.

Prashant Suryawanshi
Prashant Suryawanshihttps://www.mymahanagar.com/author/sprashant/
गेल्या १६ वर्षांपासून नाशिकमध्ये प्रिंट आणि डिजिटल मीडियात काम. तंत्रज्ञानातील बदल, पर्यावरण, सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर विपुल लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -