घरमहाराष्ट्रनाशिकनांदूरमधमेश्वरमध्ये दूषित पाण्याने शेकडो माशांचा मृत्यू

नांदूरमधमेश्वरमध्ये दूषित पाण्याने शेकडो माशांचा मृत्यू

Subscribe

लासलगाव : महाराष्ट्राचे भरतपूर म्हणून ओळख असलेल्या निफाड तालुक्यातील नांदूरमधमेश्वर धरणात दूषित पाण्यामुळे शेकडो माशांचा मृत्यू झाला. पाण्यामध्ये रसायनयुक्त पाणी मिसळल्याने ऑक्सिजन कमी होऊन मासे मृत झाल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.

रामसर दर्जा प्राप्त झालेल्या नांदूरमधमेश्वर पक्षी अभयारण्यात २७० पेक्षा अधिक जातींच्या पक्ष्यांचे दर्शन होते. चमचा, शरटी, पाणकाडी, बगळा, पानकावळे, जांभळी, पाणकोंबडी, वारकरी, राखी बगळा, रातबगळा, राज्यपक्षी हरियाल, पावश्या, घुबड, वेडा राघू, नीलपंख, सुतार, तरंग, गडवाल, मलाई, थापड्या, हळदी-कुंकू असे पक्षी आढळून येतात. या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर जलचर प्राणी राहत असल्याने या दूषित पाण्यामुळे नक्कीच त्यांनादेखील धोका निर्माण झाला आहे. तसेच, लासलगावसह १६ गावांमध्ये पाणीपुरवठा योजना असल्याने या दूषित पाण्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता आहे. या प्रकाराकडे धरण प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी केली जाते आहे.

- Advertisement -

रासायनिकयुक्त पाणी हे धरण क्षेत्रात कसे गेले, असा प्रश्न निर्माण झाला आहे. रासायनयुक्त पाण्यामुळे माशांना ऑक्सिजन मिळाला नसल्याचे सांगितले जात आहे. याच धरणातून लासलगावसह १६ गावांमध्ये पाणीपुरवठा केला जातो. नागरिक हे पाणी सांडपाणी व पिण्यासाठी वापरतात. यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्नही गंभीर बनला.

सरकारी यंत्रणांकडे लक्ष

दूषित पाण्याच्या स्त्रोतांचा शोध घेऊन जिल्हा प्रशासन व प्रदूषण नियंक्षण मंडळाने दोषींविरुद्ध कठोर कारवाई करावी, अशी मागणी स्थानिक गावकर्‍यांनी केली आहे. दूषित पाण्याचे प्रमाण वाढल्यास त्याचा गावकर्‍यांनाही त्रास होऊ शकतो. यापूर्वीही अशीच घटना घडली होती.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -