गोंदे दुमाला येथे चहा प्यायला थांबलेल्या परिवारातील एका ८ वर्षीय चिमुकलीचा विजेचा धक्का बसल्याने मृत्यू झाला. याप्रकरणी वाडीवर्हे पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सायली किरण थोरात (रा. कळवा, ठाणे) असे मृत चिमुकलीचे नाव आहे. कळवा येथील किरण थोरात हे पत्नी पुष्पा किरण थोरात आणि इतर पाच जणांसह विवाह सोहळ्यासाठी इगतपुरी तालुक्यात आले होते. गुरुवारी सकाळी १२ च्या सुमारास गोंदे दुमाला येथे सर्वजण चहा पिण्यास थांबले. त्यावेळी सायली ८ वर्षीय बालिका एका विजेच्या खांबाजवळ गेली. खांबामध्ये वीज प्रवाह असल्याने तिला विजेचा तीव्र धक्का बसला. ही बाब लक्षात येताच माजी उपसरपंच कमलाकर नाठे यांनी नरेन्द्राचार्य संस्थानच्या मोफत रुग्णवाहिकेचे रुग्णमित्र निवृत्ती पाटील गुंड यांना माहिती दिली. त्यांनी तात्काळ तिला जिल्हा रुग्णालयात दाखल केले. उपचार दरम्यान तिचा मृत्यू झाला.
चहा प्यायला थांबले आणि चिमुकलीचा शॉकने मृत्यू
written By My Mahanagar Team
Nashik
याप्रकरणी वाडीवर्हे पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद
संबंधित लेख
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -