राज्यातील व्यावसायिकांच्या तीव्र भावना लक्षात घेता राज्य सरकारने अखेर दुकानांच्या वेळेत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. तसा अध्यादेशही आज सायंकाळी जारी केला. या आदेशांनुसार सोमवार ते शुक्रवारदरम्यान सकाळी ७ ते रात्री ८, तर शनिवारी दुपारी ३ वाजेपर्यंत दुकाने खुली ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. रविवारी मात्र अत्यावश्यक सेवा वगळता अन्य सर्व आस्थापना बंद राहणार आहेत.
अशी आहे नवी नियमावली
- सर्व प्रकारची दुकाने व शॉपिंग मॉल्स रात्री ८ वाजेपर्यंत सुरू ठेवता येतील
- शनिवारी मात्र दुकाने दुपारी 3 वाजेपर्यंत सुरु ठेवता येणार
- रविवारी अत्यावश्यक सेवा वगळता अन्य सर्व आस्थापना बंद राहतील
- सर्व मैदाने, उद्याने ही व्यायाम, वॉक, जॉगिंग व सायकलिंगसाठी खुली ठेवण्यास मंजुरी
- सरकारी आणि खासगी कार्यालये पूर्ण क्षमतेने सुरू राहतील
- कृषी, औद्योगिक, नागरी, दळणवळणाची कामे पूर्ण क्षमतेने करण्यास मंजूरी
- जिम, योगा केंद्र, सलून, ब्युटी पार्लर, स्पा ५० टक्के क्षमतेने सुरु ठेवता येतील
- सर्व धार्मिक प्रार्थनास्थळे पुढील आदेशापर्यंत बंद राहतील
- रात्री ९ ते पहाटे ५ वाजेपर्यंत संचारबंदी लागू असेल