घरमहाराष्ट्रनाशिकनांदगावचा ’ सब वे ’ ठरतोय जीवघेणा

नांदगावचा ’ सब वे ’ ठरतोय जीवघेणा

Subscribe

रेल्वे प्रशासनाने 'सब वे' बाबत योग्य तो निर्णय घ्यावा ; स्थानिक नागरिकांची मागणी

नांदगावला रेल्वे फाटक बंद केल्यानं नागरीकांच्या सोयीसाठी उभारलेला सब वे आता जीवघेणा ठरत असल्याची घटना समोर आली आहे. ‘सब वे’ मध्ये साठलेल्या पाण्यातून पलीकडे जाण्याचा प्रयत्न करणारी एक व्यक्ती पाण्याचा अंदाज न आल्याने बेशद्ध होऊन पाण्यातच पडली.

हा प्रकार लक्षात येताच आसपासच्या नागरिकांनी तातडीनं प्रसंगावधान दाखवत त्या व्यक्तीला बाहेर काढत रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. सुदैवाने त्या व्यक्तीचा जीव वाचलाय. दरम्यान या ‘सब वे’ बाबत अनेक आंदोलने करण्यात आले, मंत्र्याचे दौरे झाले, पाहणी झाली. मात्र अद्याप यावर उपाय करण्यात आलेला नाही. रेल्वे प्रशासनाने या ‘सब वे’ बाबत योग्य तो निर्णय घ्यावा अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -