सावानातर्फे यापूर्वी जीवनगौरव प्रथम पुरस्कार लेखक चंद्रकांत महामिने व द्वितीय पुरस्कार लेखक प्रभाकर बागूल यांना देण्यात आला होता. अनुष्टुभबरोबरच स्तंभलेखन, संपादन, मुलांसाठी संतचरित्र लिहिणारे गो. तु. पाटील यांनी वि. वा. शिरवाडकरांच्या हयातीत ’नटसम्राट समीक्षा’ या पुस्तकांचे संपादन केले आहे. ’ओल अंतरीची’ ही त्यांची आत्मकथा प्रसिद्ध आहे. चार दशके सांस्कृतिक विश्वात वावरणारे गो. तु. पाटील अजातशत्रू, व्यक्तिमत्व खान्देशातील एक लहान खेड्यातून त्यांनी शिक्षणाच्या बळावर प्रवास केला. प्राथमिक शाळेत शिक्षकाची नोकरी करीत असताना त्यांनी मराठी विषय घेऊन एम. ए. पदवी संपादन केली. गेवराई (बीड) मालेगाव, येवला. या महाविद्यालयात त्यांनी अध्यापनाचे काम केले. विद्यार्थीप्रिय शिक्षक ही त्यांची ओळख असून, ते प्रगत विचारांचा सतत पाठपुरावा करीत राहतात. शेतकरी संघटनेचा नेता असणार्या मोहन गुंजाळ यांच्या स्मृतिग्रंथाचे संपादन त्यांनी रणजीत परदेशी यांच्यासमवेत केले आहे. यावेळी अध्यक्ष प्रा.विलास औरंगाबादकर, उपाध्यक्ष नानासाहेब बोरस्ते, उपाध्यक्ष किशोर पाठक, कार्याध्यक्ष जयप्रकाश जातेगावकर, डॉ.धर्माजी बोडके, अॅड.अभिजित बगदे,गिरीश नातू, शंकर बर्वे, डॉ.वेदश्री थिगळे, देवदत्त जोशी, संजय करंजकर, प्रा.डॉ.शंकर बोर्हाडे आदी उपस्थित होते.