तारवालानगर लिंकरोड रस्त्याच्या दुभाजकांमध्ये माती टाकलेली असतानासुद्धा आधीची माती काढून नवीन माती टाकली जात आहे. त्यामुळे माती रस्त्यावर येत असून, पावसामुळे रस्त्यावर चिखल होत आहे. रस्त्यावर आलेल्या माती व चिखलामुळे शनिवारी (दि.१२) रात्री 8.30 वाजता मालवाहू ट्रक पलटी झाली. सुदैवाने अपघातात जीवितहानी झाली नाही. अपघातामुळे रस्त्यांवर वाहतुकीला अडथळा निर्माण झाला होता. या ठिकाणी पुन्हा अपघात होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे महापालिकेने तत्काळ दुभाजकांचे कामकाज पूर्ण करावे, अशी मागणी प्रभाग चारमधील नागरिक करु लागले आहेत.
दुभाजकांमधील माती ठरली जीवघेणी
written By My Mahanagar Team
Nashik
तारवालानगर लिंकरोड वरील घटना, महापालिकेचा कारभार ठरला कारणीभूत
संबंधित लेख
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -