कळवण तालुक्यात गेल्या काही महिन्यांपासून वीज वितरण संबंधित तक्रारींमध्ये वाढ होत असून वाढीव वीज बिलांमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. शेतकरी बांधव व वीज ग्राहकांना वाढीव वीज बिल न देता नियमित बील देऊन ग्राहकांच्या गावनिहाय तक्रारी सोमवारपासून जाणून घेऊन त्यांची सोडवणूक करावी अशी सूचना जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा जयश्री पवार यांनी महावितरणच्या अधिकार्यांना केली.
पंचायत समितीचे उपसभापती विजय शिरसाठ, माजी सभापती आशा पवार, जगन साबळे, ज्ञानदेव पवार, मनोहर ठाकरे, भिवा बागुल, प्रभू बागुल, उग्रवाल चव्हाण, राजू पाटील, रामदास चव्हाण आदीनी तक्रारी नोंदवल्या. बैठकीला चणकापूर, देसगाव, बोरदैवत परिसरातील शेतकरी, सरपंच उपस्थित होते.