घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रगावी जाण्यासाठी कंटेनरने प्रवास सुरू केला, अघटित झाले; आईसह ५ वर्षीय चिमुकलीचा...

गावी जाण्यासाठी कंटेनरने प्रवास सुरू केला, अघटित झाले; आईसह ५ वर्षीय चिमुकलीचा अंत

Subscribe

नाशिक : नाशिक येथील मुंबई आग्रा महामार्गावरील द्वारका ते आडगाव उड्डाणपुलावर झालेल्या भीषण अपघातात आई सह ५ वर्षीय बलिकेचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. उड्डाणपुलावर उभ्या असलेल्या नादुरुस्त आयशरला कंटेनरने मागून धडक दिल्याने अपघात झाला. या घटनेत ३२ वर्षीय नफीझा शेख यांच्यासह त्यांची ५ वर्षीय चिमुकली तरननुम शेख हिचा जागीच मृत्यू झाला आहे. तर, अफझल शेख आणि आयशा शेख ही ६ वर्षीय चिमुकलीसह कंटेनर चालक गंभीर जखमी झाले आहेत.

नाशिक मधील उड्डाणपुलावर वारंवार आपघातांच्या छोट्या मोठ्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. उड्डाणपुलावर दुचाकी वाहतुकीला बंदी असतानाही पोलिसांच्या दुर्लक्षामुळे अवैधरित्या दुचाकीचालक उड्डाणपुलावरून प्रवास करतात. तसेच, उड्डाणपुलावर वाहन थांबवण्यास मनाई असताना अनेकदा त्याठिकाणी वाहने उभी असल्याचे दिसून येते. यातून सातत्याने आपघातांना आमंत्रण देण्याचे प्रकार घडतात. वाहन चालकांचा निष्काळजीपणा आणि पोलीस प्रशासनाचे दुर्लक्ष यामुळे आपघातांचे प्रमाण वाढले आहे.

- Advertisement -

दरम्यान, मिळालेल्या माहिती नुसार, द्वारका ते आडगाव दरम्यान धुळ्याच्या दिशेने नादुरुस्त झाल्यामुळे आयशर उड्डाणपुलावर उभा होता. सकाळी ६:३० वाजेच्या सुमारास इगतपुरी येथून धुळ्याच्या दिशेने जात असलेलया कंटेनर चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने कंटेनर थेट उभ्या असलेल्या आयशरला जाऊन धडकला. नाशिक तालुक्यातील गौळाणे येथील शेख कुटुंब या कंटेनरमधून प्रवास करत होते. धडक इतकी भीषण होती की कंटेनरची चालक केबिन त्यात चक्काचूर झाली. यात आई नफीझा शेख यांच्यासह त्यांची ५ वर्षीय चिमुकली तरननुम शेख हिचा जागीच मृत्यू झाला आहे. तर, नफीझा शेख यांचे पती अफझल शेख व ६ वर्षाची दुसरी मुलगी आयशा शेख हिच्यासह कंटेनर चालक गंभीर जखमी झाले आहेत. दरम्यान, जखमींना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -