घरताज्या घडामोडीविश्वनाथ परांजपे कालवश

विश्वनाथ परांजपे कालवश

Subscribe

नाशिक शहरात ब्रिज खेळ रुजवून त्यात अनेक खेळाडू घडवणारे व मित्र विहार क्लबचे माजी सचिव विश्वनाथ परांजपे (वय ७५) यांचे गुरुवारी (दि.१४) निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, सून, नातू असा परिवार आहे.

महिंद्रा कंपनीतून सेवानिवृत्त झालेले परांजपे उत्कृष्ट ब्रिजपटू होते. त्यांनी मित्र विहार ब्रिज संघाकडून खेळताना विविध राष्ट्रीय स्पर्धा गाजवल्या. नाशिकमध्ये ब्रीज खेळाच्या प्रसारासाठी त्यांनी प्रयत्न करून अनेक खेळाडू घडावल्याचे डॉ. प्रशांत पुरंदरे यांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -