घरमहाराष्ट्रनाशिककादवा काठावरील गावांना पाणीटंचाईच्या झळा

कादवा काठावरील गावांना पाणीटंचाईच्या झळा

Subscribe

करंजवण धरणातून आवर्तन सोडण्याची मागणी

दिंडोरी : तालुक्यातील कादवा नदीपात्र संपूर्णपणे कोरडे पडल्यामुळे कादवा काठावरील ओझे, म्हेळुस्के, लखमापूर, करंजवण आदी परिसरामध्ये पाणीटंचाई निर्माण झाली असून नदीपात्र कोरडे पडल्यामुळे जनावरासह वन्यजीवाना अस्तित्व धोक्यात येऊ पाहात आहे.करंजवण धरणापासून अर्धा किमी अंतरापासूनच नदीपात्र कोरडे पडले आहे. कादवा नदी परिसरातील गावांमध्ये कादवा नदी असल्यामुळे जिल्ह्याच्या बाहेरून मोठ्या प्रमाणात मेंढपाळ दाखल झाले आहे. मात्र कादवा नदीपात्र कोरडे पडल्यामुळे मेंढपाळांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. नदीपात्र कोरडे झाल्यामुळे नदीपात्रात असणारे जलचराना मृत्यू झाला आहे यामध्ये बेंडूक व लहान माशांचा मोठ्या प्रमाणात मृत्यू झाला आहे. त्याचप्रमाणे गावामधील पाणीपुरवठा योजना कादवा नदीलगत असल्यामुळे पाणीपुरवठा योजनेलाही पाणीटंचाईचा मोठा फटका बसत आहे.

हवामान खात्याच्या अंदाजनुसार मागील दोन ते तीन वर्षापासून २५ मे ते ५ जून पर्यत या परिसरामध्ये समाधानकारक पाऊस पडल्यांमुळे पाणीटंचाई दूर झाली. आजच्या परिस्थितीचा विचार करता व हवामान खात्याच्या अंदाजानुसार पाऊस पडण्यासाठी फक्त १५ दिवस बाकी असून करंजवण धरणामध्ये मागील तीन वर्षाचा विचार करता पाणीसाठा समाधानकारक असून पाणी सोडण्यास अडचण नाही. मात्र पाटबंधारे विभागाकडून पालखेड जलाशयात पाणी सोडण्याची मागणी झालेली नाही, असे सांगण्यात येत आहे. म्हणजे जेव्हा येवला, निफाड व मनमाडची पाण्याची मागणी होईल तेव्हाच पाणी सुटणार का? असा प्रश्न स्थनिक जनतेला पडला आहे.

- Advertisement -

कारण अनेक वेळा खालच्या तालुक्यांनी मागणी केल्यानंतरच करंजवण धरणातून पाणी सोडण्यात आले आहे. म्हणजे पाटबंधारे विभाग व प्रशासन स्थानिक जनतेची पाण्याची मागणी लक्षात घेत नाही असे दिसून येत आहे. स्थानिक जनतेची पाण्याची टंचाई लक्षात घेता करंजवण धरणातून आवर्तन सोडण्यात यावे अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे.

दिंडोरी तालुक्यातील कादवा नदी परिसरातील ओझे, करंजवण, म्हेळुस्के, लखमापूर, अवनखेड येथील शेतकर्‍यांनी पाणीवापर संस्था स्थापन करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. करंजवण धरणामध्ये आपले पाणी आरक्षित नाही यासाठी बारमाही पाणी वापर संस्था स्थापन कराव्यात यासाठी सर्व प्रकारची मदत कादवा कारखाना संचालक मंडळासह महाराष्ट्र राज्य विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ हे ही करतील. यासाठी स्थानिक शेतकर्‍यांनी पाणीवापर संस्थांची स्थापना करावी व आपले पाणी आरक्षित करावे.
– श्रीराम शेटे, चेअरमन कादवा सहकारी साखर कारखाना

चालू वर्षीचा विचार करता राज्यात मोठ्या प्रमाणात उष्णतेची लाट असल्यामुळे नदीपात्रातील पाण्याचे बाष्पीभवन जास्त होत असल्यामुळे नदीपात्र आवर्तन बंद केल्यानंतर ५ ते ६ दिवसात नदीपात्र कोरडे पडत आहे. पाटबंधारे विभागाने आवर्तनाचे महिन्याच्या महिन्याला नियोजन केल्यास पाणी टंचाई निर्माण होणार नाही. नियोजन न करता एकाचवेळी मोठ्या प्रमाणात पाणी सोडून दिले जाते. त्यामुळे कादवा नदीकाठावरील गावांमध्ये पाणीटंचाई निर्माण होते.
– दत्तात्रय गोजरे, ओझे

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -