दारुचे दुकान चालू ठेवायचे असेल तर दरमहा १० हजार रूपयांची खंडणीची मागणी एकाने दुकानमालकाकडे केली. ही घटना सोमवारी (दि.१८) दुपारी १.३० वाजेदरम्यान अमृतधाम येथील बॉम्बे वाईन्स दुकानात घडली. याप्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात राजेंद्र सुरेश फडोळ (रा. स्वामी नारायण नगर) यांनी तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार पोलिसांनी एकावर गुन्हा दाखल केला आहे.
सागर सुर्यवंशी (३४, रा. सुर्यवंशी मळा) असे गुन्हा दाखल झालेल्या संशयिताचे नाव आहे.
- Advertisement -
पोलिसांच्या माहितीनुसार, सुर्यवंशी याने फडोळ यांच्या अमृतधाम येथील बॉम्बे वाईन्स दुकानात आला. आमच्या भागात दुकान चालवायचे असेत तर दरमहा १० हजार रूपये खंडणी द्यावी लागेल अन्यथा जीवे ठार मारू, अशी धमकी त्याने दुकानमालकाला दिली. पुढील तपास आडगाव पोलीस करत आहेत.