घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रलोकसहभागातून ६ हजार बंधार्‍यांचे काम पूर्ण; हजारो हेक्टर जमीन झाली हिरवीगार

लोकसहभागातून ६ हजार बंधार्‍यांचे काम पूर्ण; हजारो हेक्टर जमीन झाली हिरवीगार

Subscribe

नाशिक : नाशिक विभागात लोकसहभागातून वनराई बंधारे बांधण्याचे काम प्रगतीपथावर असून, विभागात लोकसहभागातून 6 हजार, 134 बंधारे बांधण्याचे काम लोकसहभागातून पूर्ण झाले आहे. या बंधार्‍यांच्या माध्यमातून विभागामध्ये एकूण 1227 टी.सी.एम.जलसाठा अडविला आहे. त्यामुळे 12 हजार 268 हेक्टर क्षेत्रावरील रब्बी पिकांना संरक्षित सिंचन उपलब्ध होणार आहे.

पारंपरिक पद्धतीने पाणी अडवून पाण्याचा साठा करुन बिगर पावसाळी हंगामातील पिकासाठी पुरविणे गरजेचे आहे. त्यासाठी वनराई बंधारे बांधणे आवश्यक आहे. वनराई बंधार्‍यातील पाण्याचा उपयोग पिण्याच्या पाण्याकरिता, गुरांना पिण्याकरिता, कपडे धुण्याकरिता, वनराई बंधार्‍यांच्या आजूबाजूला असलेल्या विहिरींच्या पाण्याच्या पातळीत वाढ होण्याकरिता मदत होते. तसेच वनराई बंधार्‍याच्या पाणी साठ्यांमधून पाण्याचा उपसा करून रब्बी व उन्हाळी हंगामामध्ये भाजीपाला, कडधान्य, कलिंगड, तृणधान्य, गळीत धान्यासारखी पिके घेण्यासाठी मदत होते.

- Advertisement -
नाशिक विभाग राज्यात प्रथम

विभागात आजपर्यंत नाशिक 3 हजार 755, धुळे 608, नंदूरबार 1 हजार 340, जळगाव 431 असे एकूण 6 हजार 134 वनराई बंधारे बांधण्याचे काम लोकसहभागातून पूर्ण करण्यात आले आहेत. राज्यात नाशिक कृषी विभागाने सर्वात जास्त वनराई बंधारे बांधण्याचे काम श्रमदानातून व लोकसहभातून पूर्ण केल्यामुळे नाशिक विभाग राज्यात प्रथम क्रमांकावर आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -