घरमहाराष्ट्रनगरची जागा राष्ट्रवादीने काँग्रेससाठी सोडली

नगरची जागा राष्ट्रवादीने काँग्रेससाठी सोडली

Subscribe

डॉ. सुजय विखे पाटील यांचा मार्ग मोकळा

काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँगे्रस या दोन्ही पक्षांची लोकसभा निवडणुकीसाठी आघाडी झाली असली तरी नगरच्या जागेचा तिढा कालपर्यंत कायम होता. या ठिकाणी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे-पाटील यांचा मुलगा डॉ. सुजय विखे-पाटील यांचा दावा होता. अखेर राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांच्याकडे असलेली लोकसभेची अहमदनगरची जागा काँग्रेसला सोडली, तशी घोषणा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केली.

नगर जिल्ह्यातील लोकसभेची नगरची जागा राष्ट्रवादीकडे तर शिर्डीची काँग्रेसकडे आहे. मात्र, डॉ. विखे यांनी नगरसाठी गेल्या दोन अडीच वर्षांपासून तयारी सुरू केली आहे. त्यामुळे राष्ट्रवादीने ही जागा काँग्रेसला सोडावी, अशी मागणी होत होती. जागा वाटपाच्या बैठकांमधून यावर चर्चा होत असताना राष्ट्रीय निवड समितीपर्यंत राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेतेही या जागेवर ठाम होते. एवढेच नव्हे तर राष्ट्रवादीकडून या जागेसाठी अनेक उमेदवारांची नावेही पुढे आणली जात होती. शेवटी काँग्रेसच्या अनुराधा नागवडे यांना पक्षात घेऊन त्यांना येथून राष्ट्रवादीचे उमेदवारी देण्याचे ठरले होते. मात्र, ऐनवेळी त्यांचा प्रवेशच रद्द करण्यात आला.

- Advertisement -

त्यानंतर शुक्रवारी पवार यांनी ही जागा काँग्रेसला सोडल्याची घोषणा केली आहे. ही जागा काँग्रेसला सोडावी यासाठी विखे यांच्याकडून विविध प्रयत्न सुरू होते. भाजपसह अन्य पक्षांत जाण्याची तयारी दर्शवत दबाव टाकण्याचाही प्रयत्न झाला, तर पवार ऐकत नाहीत हे पाहून विखे यांनी पवार आपल्याला पितृतूल्य असल्याचे सांगत त्यांनी नातवासाठी जागा सोडावी, असे साकडेही घातले होते. या जागेवरून भाजपचा उमेदवार तीन वेळा विजयी झालेला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचा सतत पराभव झाला आहे. मात्र, मागील निवडणुकांत राष्ट्रवादीच्या उमेदवाराला जास्त मते असल्याचे सांगत राष्ट्रवादीकडून ही जागा सोडण्यास नकार दिला जात होता.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -