घरताज्या घडामोडी...आता सतरंजी उचलायलाही कार्यकर्ता शिल्लक नाही, नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंना टोला

…आता सतरंजी उचलायलाही कार्यकर्ता शिल्लक नाही, नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंना टोला

Subscribe

अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. आम्हाला तुरुंगामध्ये टाकणाऱ्या उद्धव ठाकरे यांच्याकडे आता सतरंजी उचलायलाही कार्यकर्ता शिल्लक नाही, अशी टीका नवनीत राणा यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली आहे.

जळगाव शहरातील महाराणा प्रताप गणेश मंडळात आज खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा दाम्पत्याचा हनुमान चाळीसा पठणाचा कार्यक्रम झाला. यापूर्वी राणा दाम्पत्यांनी मंडळाच्या बाप्पाचं दर्शन घेत आरती केली. त्यानंतर हनुमान चाळीसा पठण केलं. तसेच जळगावमध्ये खुल्या जीपमधून भव्य अशी रॅली काढण्यात आली. ढोल ताशांच्या गजरात निघालेल्या या रॅलीत फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली.

- Advertisement -

हनुमान चालीस पठणाचे आव्हान दिल्यानंतर ठाकरे सरकारने आम्हाला तुरुंगामध्ये टाकले. कसाबप्रमाणे आम्हाला वागणूक दिली. सत्तेचा दुरूपयोग करण्यात येवून मला आणि माझ्या पत्नीला त्रास देण्यात आला. आमच्यासोबत जे घडलं, त्याची शिक्षा उद्धव ठाकरेंना मिळाली आहे. आमच्यासाठी सतरंजी टाकली नाही, ज्याच्याकडे सतरंजी उचलायला सुध्दा कार्यकर्ता उरला नाही, अशी टीका रवी राणांनी केली.

आम्ही मोदींचे भक्त आहोत, आम्हाला त्यांचा अभिमान आहे. सर्व जण आपल्या कुटुंबासाठी करतात, मात्र मोदींजींना कुटूंब नाही. तर संपूर्ण भारत देश त्यांचं कुटूंब आहे. देशातील सर्व जनतेची ते सेवा करतात, असं म्हणत नवनीत राणा यांनी मोदींवर स्तुतीसुमनं उधळली.

- Advertisement -

हेही वाचा : राहुल गांधींची पदयात्रा देशाला नवीन नाही, राधाकृष्ण विखे पाटलांची टीका


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -