घरमहाराष्ट्रअग्निपथ योजनेविरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेस रस्त्यावर; ठाणे हायवेवर रस्ता रोको

अग्निपथ योजनेविरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेस रस्त्यावर; ठाणे हायवेवर रस्ता रोको

Subscribe

केंद्र सरकारने नियमित सैन्य भरती बंद करून अग्निपथ ही योजना आणली आहे. या योजनेनुसार सैन्यात भरती होणाऱ्या तरूणांना चार वर्षांनंतर निवृत्त करण्यात येणार आहे

चार वर्षांसाठी सैन्यात भरती करून नंतर तरूणांना वाऱ्यावर सोडणाऱ्या अग्निपथ या योजनेविरोधात राष्ट्रवादी युवक आक्रमक झाली आहे. ठाणे शहरात गृहनिर्माण मंत्री डाॅ.जितेंद्र आव्हाड यांच्या आदेशानुसार शहराध्यक्ष आनंद परांजपे यांच्या मार्गदर्शनाखाली युवक शहराध्यक्ष विक्रम खामकर यांच्या नेतृत्वाखाली तसेच प्रदेश सरचिटणीस उमेश अग्रवाल यांच्या उपस्थितीत रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. सुमारे अर्धा तास हाय वेवर रास्ता रोको करण्यात आल्यामुळे मुंबईकडे जाणारी वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती.

केंद्र सरकारने नियमित सैन्य भरती बंद करून अग्निपथ ही योजना आणली आहे. या योजनेनुसार सैन्यात भरती होणाऱ्या तरूणांना चार वर्षांनंतर निवृत्त करण्यात येणार आहे. यामुळे बेरोजगारांची संख्या वाढीस लागणार आहे. तसेच या तरूणांना भाजपच्या कार्यालयावर सुरक्षा रक्षक म्हणून नेमण्यात येणार असल्याचे भाजपचे नेते म्हणत आहेत, या सर्वांचा निषेध म्हणून राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या ठाण्यातील कार्यकर्त्यांनी पाचपाखाडी येथे मुंबईच्या दिशेने जाणारा पूर्वद्रूतगती महामार्ग अडवला. अचानक केलेल्या या आंदोलनामुळे प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती. सुमारे अर्धा तासानंतर नौपाडा पोलिसांनी सर्व कार्यकर्त्यांना ताब्यात घेतली. यावेळी पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये जोरदार झटापट झाली.

- Advertisement -

या वेळी शहराध्यक्ष विक्रम खामकर यांनी सांगितले की, सैनिकांना वन रँक वन पेंशन देतो म्हणत सत्तेत आलेल्या मोदी सरकारचा प्रवास आता “नो रँक नो पेंशन”, पर्यंत येवून थांबला आहे. अग्नीवीरच्या नावाखाली जो खेळ मोदी सरकारने सुरू केलाय तो येणाऱ्या काळात आपल्या देशाला अत्यंत भयानक स्थिती कडे नेवू शकतो.४ वर्षाची सेवा देवून बाहेर पडणाऱ्या लोकांच्या नंतर सशस्त्र टोळ्या बनू शकतात.यांचा वापर नंतर सामान्य लोकांच्या विरोधात होवू शकतो किंवा एखाद्या राज्याचं सरकार पाडण्यापर्यंत देखील होवू शकतो. भविष्यात हे अग्नीवीर आपल्या देशात दहशतवाद्यांच्या हाती लागले तर काय होईल, याची कल्पनाच असह्य आहे.

आजही सैन्यदलातून सेवानिवृत्ती झालेल्या केवळ ३% लोकांनाच नोकऱ्या मिळतात,हे वास्तव आहे.अ श्या स्थितीत आपल्या आयुष्यातील ४ महत्वाची वर्ष देऊन, बाहेर पडणाऱ्या तरुणांना नंतर नेमकी कोणती काम मिळणार..?याबाबत मोदी सरकारकडे कोणतीही योजना नाही. परिणामी, ४ वर्षाच्या सेवेनंतर जेंव्हा भविष्य अंधकारमय दिसेल तेंव्हा शस्त्रास्त्रांची ट्रेनिंग घेतलेली तरुण मंडळी कोणता मार्ग अवलंबवतील या बाबत सांगणे अवघड आहे. त्यामुळे ही योजना रद्द करावी, अशी मागणी खामकर यांनी केली. या आंदोलनात समीर नेटके, श्रीकांत टावरे, अभिषेक पुसाळकर, साकिब दाते, मैसर शेख आदी कार्यकर्ते सहभागी झाले होते.


आगामी सरकारमध्ये प्रहारचा मुख्यमंत्री होईल, राज्यमंत्री बच्चू कडूंचा अजब दावा


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -