राज्यात आज ११,१११ नवीन रुग्णांची नोंद झाली असून कोरोना बाधित रुग्णांची संख्या ५,९५,८६५ झाली आहे. राज्यात १,५८,३९५ सक्रीय रुग्ण आहेत. राज्यात रविवारी २८८ कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून २० हजार ३७ जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर ३.३६ टक्के एवढा आहे.
राज्यात २८८ कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. यामध्ये मुंबई ४७, ठाणे ८, नवी मुंबई मनपा ३, कल्याण डोंबिवली मनपा २, वसई विरार मनपा ३, रायगड ५, नाशिक ८, पुणे ४४, पिंपरी चिंचवड मनपा १९, सातारा ८, कोल्हापूर ३६, सांगली १३, औरंगाबाद ४, नागपूर १६ यांचा समावेश आहे. आज ८,८३७ रुग्ण बरे होऊन घरी, राज्यात आजपर्यंत एकूण ४,१७,१२३ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७० टक्के एवढे झाले आहे.
आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ३१,६२,७४० प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ५,९५,८६५ (१८.८४ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात १०,५३,८९७ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ३८,२०३ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.