काँग्रेसचे आमदार नितेश राणे यांनी शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर पुन्हा एकदा तोफ डागली आहे. ‘उद्धव ठाकरे यांनी मराठा समाजाच्या प्रतिधींचा मातोश्रीवर बोलवून अपमान केला’ असा आरोप नितेश यांनी केला आहे. नितेश राणे यांनी याबाबत ट्वीटरच्या माध्यमतून भाष्य केले आहे. ‘मराठा समाजाच्या प्रतिनिधींना उद्धव यांनी मातोश्रीवर बोलावत त्यांचा अपमान केला. मराठा समाजाची गरड नाही असंही ते म्हणाले. मग आता उद्धव ठाकारे यांनी मैदानात उतरावेच, मग आम्ही त्यांना गाजर आणि गरज मधील फरक दाखवतो’, अशी भाषा नितेश यांनी आपल्या ट्वीटमध्ये वापरली आहे. नितेश राणे विरोधकांवर किंवा सत्ताधाऱ्यांवर टीका करण्यासाठी बरेचदा ट्वीटर या सोशल मीडियाचा वापर करतात. आताही त्यांनी याच माध्यमातून शिवसेना प्रमुखांवर टीकास्त्र सोडले आहे.
मराठा समाजाच्या प्रतिधिनचा मातोश्री बोलून अपमान केला गेला अस माला कळल..
माला मराठ्यांची गरज नाही अस उद्धव ठाकरे बोलले..अस ऐकल..
आता याच मैदानात..
गरज आणि गाजर मद्द्ये फरक दाखवतो!!
हर हर महादेव!!— nitesh rane (@NiteshNRane) March 7, 2019
नितेश राणे तसंच नीलेश राणे यांनी आजवर अनेकदा शिवसेनेवर परखड शब्दात टीका केली आहे. त्यांनी ट्वीटरच्या माध्यमातून केलेल्या काही टीका तर सोशल मीडियावर आजही गाजत आहेत. निलेश यांनी त्यांच्या एका ट्वीटमध्ये ‘संजय राऊत यांची अवस्था उद्धव ठाकरेंनी यांनी गल्लीच्या कुत्र्यासारखी करून ठेवली आहे’, अशी टीका केली होती. तर काही दिवसांपूर्वीच ‘जे शिवसेनेला जैतापुरबद्दल जमलं नाही, ते कोकणच्या जनतेने आणि आम्ही नाणारविषयी करुन दाखवले. परत आमच्या कोकणाकडे वाकड्या नजरेने पहाल तर याद राखा’, असं म्हणत नाणारच्या मुद्द्यावरुन त्यांनी शिवसेनेला लक्ष्य केले होते.