घरट्रेंडिंगस्वतःची सुटका केल्याचा देशमुखांचा दावा खोटा; शिंदे गटाकडून फोटो शेअर करत पलटवार

स्वतःची सुटका केल्याचा देशमुखांचा दावा खोटा; शिंदे गटाकडून फोटो शेअर करत पलटवार

Subscribe

एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी आमदारांना अंधारात ठेवून त्यांना सूरतमध्ये नेल्याचा आरोप आमदार नितीन देशमुख (Nitin Deshmukh) यांनी केला आहे. कैलास पाटील (Kailas Patil) यांनी आपली सुटका कशी झाली याची माहिती दिल्यानंतर नितीन देशमुख यांनी त्यांच्यासोबत घडलेल्या थरारक घटनेची माहिती पत्रकार परिषदेत दिली.

एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी आमदारांना अंधारात ठेवून त्यांना सूरतमध्ये नेल्याचा आरोप आमदार नितीन देशमुख (Nitin Deshmukh) यांनी केला आहे. कैलास पाटील (Kailas Patil) यांनी आपली सुटका कशी झाली याची माहिती दिल्यानंतर नितीन देशमुख यांनी त्यांच्यासोबत घडलेल्या थरारक घटनेची माहिती पत्रकार परिषदेत दिली. भाजपने (BJP) कटकारस्थान करून महाविकास आघाडी सरकारला (Mahavikas Aghadi Government) पाडण्याचा डाव आखल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं. मात्र आमदार नितिन देशमुख यांनी केलेला हा दावा खोटा असल्याचा आरोप एकनाथ शिंदे गटाकडून करण्यात आला आहे. यासंदर्भातील काही फोटो आणि व्हिडिओ त्यांनी सोशल मीडियावर शेअर करत नितिन देशमुखांचा दावा खोटा असल्याचा आरोप केला आहे. (Nitin Deshmukh claim of self-release is false Reacting by sharing photos from Shinde group)

“आमदार नितीन देशमुखांचा मी स्वतःची सुटका करून पळून आलो हा दावा खोटा. नितिन देशमुख यांचा गुवाहाटी ते अकोला हा परतीचा प्रवास खाजगी विमानाने झाला. एकनाथ शिंदे साहेबांच्या शिलेदारांनी सन्मानाने त्यांना अकोल्याला पोहोचवले त्याची छायाचित्रे”, असे त्यांनी लिहिले आहे.

- Advertisement -

NItin deshmukh

हेही वाचा – एकनाथ शिंदे यांच्यासोबत आणि उद्धव ठाकरेंसोबत आमदार किती; वाचा एका क्लिकवर

- Advertisement -

नेमके काय म्हणाले नितिन देशमुख?

“२० तारखेला विधान परिषदेचा निकाल लागल्यानंतर एकनाथ शिंदेंनी बंगल्यावर बोलावलं असल्याची सूचना मिळाली. त्यामुळे शिंदे साहेबांचा आदेश म्हणून लगेच गाडीत बसलो आणि ठाण्यात आलो. माझ्यासोबत कोल्हापुरचे आमदार प्रकाश सोबत होते. ठाणे गेल्यानंतर गाडी पालघरला गेली. तिकडे गेल्यावर सांगण्यात आलं की पालघरचे आमदार श्रीनिवास वाणगा यांच्या घरी जायचं असल्याचं सांगण्यात आलं. पण तिथे न थांबला पालघरमध्ये एका हॉटेलमध्ये थांबवण्यात आलं. तिथे चहा-पाणी घेण्यात आला. तेव्हा माझ्या मनात शंकेची पाल चुकचुकली. सरकारविरोधात काही मोठं कटकारस्थान रचलं असल्याचं वाटू लागलं. त्यामुळे तिथल्या टपरीवाल्याला हा रस्ता कुठे जातो, असं विचारलं. हा रस्ता थेट गुजरातला जात असल्याचं त्या टपरीवाल्याने सांगितलं. तेवढ्यात तिथे आणखी तीन मंत्री आले. त्या मंत्र्यांना घेऊन गाडी गुजरातच्या दिशेने जाऊ लागली. तेव्हा त्यांच्या फोना-फोनी सुरू झाले. हा आमदार आला का, तो आमदार आला का याची चौकशी सुरू झाली. तेव्हा मला खात्री पटली हे काहीतरी सरकारविरोधात डाव सुरू आहे. आम्ही आमच्यासोबत कपडे वगैरे काही आणले नव्हते. तेव्हा तुम्ही कसली काळजी करू नका असं आम्हाला सांगण्यात आलं. तेवढ्याच लगेच खबर मिळाली की कैलास गायब झाला. कैलास गायब झाल्याची माहिती कळताच, मला बरं वाटलं. ही परिस्थिती काय सुरू आहे, याची कल्पना नव्हती. त्यामुळे मी लगेच उद्धव साहेबांना मॅसेज करून ठेवला. मी सूरतवरून परत येईन, असं आश्वासन दिलं. सूरतला पोहोचल्यावर आमची फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये सोय करण्यात आली होती. तिथे खूप मोठा पोलीस फौजफाटा होता. मुंबईतही एवढा मोठा पोलीस फौजफाटा मी पाहिला नव्हता कधी. आपीएस अधिकारीही तिथे उपस्थित होते, असं नितीन देशमुख यांनी सांगितलं. तिथून पुढे माझ्या हार्ट अटॅकचा बनाव रचण्यात आला. मला कोणतीच व्याधी नाही. तरी मला हार्ट अटॅक आल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. आज मी आमदार असलो तरी मी शिवसेनेच्या भरोवश्यावर आमदार झालो. उद्धव साहेबांच्या आशिर्वादाने आमदार झालो आहे. बाळासाहेबांच्या आशिर्वादाने झालो आहे. मला माझ्या शिवसैनिकांनी निवडून दिलं आहे. माझ्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी निवडून दिलं आहे. त्यामुळे माझी तिथे असलेल्या आमदारांना विनंती आहे की, त्यांनी तुम्ही कोणत्याही आमिशाला बळी न पडता, ज्या सामान्य कार्यकर्त्यांनी तुमच्यासाठी जीवाचे रान केले. रात्रीचा दिवस केला त्यांचा तुम्ही विचार करा आणि मावळ्यांनो परत या. ही एवढीच तुम्हाला विनंती करतो. शिंदे साहेबांनाही विनंती करतो की त्यांनी भाजप कटकारस्थान रचत आहे. आपण बाळासाहेबांचे मावळे आहोत. आपण जिल्हा प्रमुख होते, शिवसेनेचे नेते होते आता मंत्री आहात. ज्या बाळासाहेबांनी आपल्याला प्रेम दिले त्या बाळासाहेबांची आठवण ठेवून तुम्ही परत या, अशी कळकळीची विनंतीही नितीन देशमुख यांनी केली.”, असे नितिन देशमुख यांनी म्हटले.

NItin deshmukh

हेही वाचा – वर्षा निवासस्थानावरील बैठकीत या आमदारांची उपस्थिती राहणार

नागपुरात दाखल झाल्यावर देशमुखांनी काय म्हटले?

“माझा रक्तदाब वाढला नव्हता. पण मला हार्ट अटॅक आल्याचा बनाव रचण्यात आला. मला रुग्णालयात नेल्यानंतर २०-२५ जणांनी पकडून बळजबरीने इंजेक्शन टोचले. ते इंजेक्शन काय होतं माहिती नाही. मी रात्री १२ वाजता हॉटेलमधून निघालो. रात्री तीन वाजता रस्त्यावर उभा होतो. माझ्यापाठी २०० पोलीस होते. पण मला कोणी लिफ्ट दिली नाही. त्यानंतर पोलिसांनी मला रुग्णालयात नेलं आणि मला हार्टअटॅक आल्याचा बनाव रचला. अटॅकचं कारण सांगून मला मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. मी उद्धव ठाकरेंचा शिवसैनिक आहे. मी मंत्र्यांसोबत गेलो होतो पण मी उद्धव ठाकरे आणि बाळासाहेबांचा शिवसैनिक आहे”, असं त्यांनी म्हटले.


हेही वाचा – उद्धव ठाकरेंचे मुख्यमंत्रीपद जाणार हे निश्चित, शिवसेने समोर दोनच पर्याय

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -