घरताज्या घडामोडीTerrorist : महाराष्ट्र पोलिसांचे इंटेलिजन्स फेल्युअर नाही - गृहमंत्री

Terrorist : महाराष्ट्र पोलिसांचे इंटेलिजन्स फेल्युअर नाही – गृहमंत्री

Subscribe

दिल्ली आणि देशातील काही राज्यात दहशतवाद्यांना झालेल्या संशयित आरोपींच्या बाबतीत वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत घटनेसंदर्भात गृहमंत्र्यांना माहिती दिली आहे. मात्र ही संपुर्ण माहिती मिळण्यासाठी वेळ लागणार आहे. दहशतवाद्यांना अटकेचे प्रकरण हे अतिशय संवेदनशील आहे. पण या प्रकरणातील वस्तुस्थिती जनतेला माहिती असायला हवी, म्हणून एटीएसचे प्रमुख विनीत अग्रवाल याबाबतची माहिती देणार आहेत. दहशतवादी अटकेच्या  प्रकरणात महाराष्ट्र पोलिसांचे इंटेलिजन्स फेल्युअर नसल्याची स्पष्टोक्ती गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी प्रसारमाध्यमांना दिली. सध्या या प्रकरणातील बारकावे सांगता येणार नाही. कारण याचा तपासावर परिणाम होऊ शकतो. या संपुर्ण प्रकरणात एटीएसचा वॉच होता, असेही ते म्हणाले.

पोलिसांना पोलिसांच्या पद्धतीने तपास करू दिले जाणे गरजेचे आहे. दिल्ली पोलिसांनी मुंबईत येऊन कारवाई केली असल्याचेही त्यांनी सांगितले. बाहेरच्या राज्यात जाऊन कारवाई करताना माहिती परिपक्व असेल तर पोलिसांना सांगितले जाते. अनेकदा माहिती गोळा करताना थेट अटक करण्यात येते, असेही ते म्हणाले. दाऊद कनेक्शन, मुंबई लोकलची रेकी या सगळ्या घटनांच्या बाबतीत एटीएस प्रमुखांकडून माहिती दिली जाणार आहे, असेही त्यांनी सांगितले.

- Advertisement -

दहशतवाद्यांना अटकेच्या विषयाचे राजकारण करण्यात येऊ नये, असेही ते म्हणाले. कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्न उपस्थित करण्याआधी आंदोलने करणाऱ्यांनी याबाबतचा विचार करावा, असेही ते म्हणाले. सरकारने काढलेल्या आदेशाविरोधात जाऊन आंदोलने होत असल्याबाबत त्यांनी नाराजी व्यक्त केली. पोलिसांना काम करण्यासाठी संपुर्ण स्वातंत्र्य आहे. कोणत्याही गोष्टीसाठी पोलिसांना अडकवून ठेवलेले नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

दिल्ली आणि देशातील काही राज्यातून काही जणांना संशयित दहशतवादी म्हणून अटक झाली आहे. अतिरिक्त मुख्य सचिव (होम), मुंबई पोलिस आयुक्त, एटीएसचे प्रमुख आणि सर्व अधिकाऱ्यांमध्ये या प्रकरणाच्या निमित्ताने आज पोलिस अधिकारी आणि गृहमंत्री दिलीप वळसे पाटी यांच्यात तातडीची बैठक पार पाडली. पोलिसांकडून जी माहिती आवश्यक होती ती देण्यात आली आहे. जान मोहम्मद शेख (४७) या मुंबईतल्या आरोपीविरोधात २००२ मध्ये एक स्थानिक पातळीवर गुन्हा दाखल असल्याची माहिती वळसे पाटील यांनी दिली. जान मोहम्मद शेखला राजस्थानातील कोटा येथून अटक करण्यात आली आहे.

- Advertisement -

सणासुदीच्या काळात दिल्लीच्या पथकाने दहशतवाद्यांना धारावीतून अटक केली आहे. यामुळे मुंबईतील घातापात उधळून टाकण्यात दिल्लीच्या पथकाला यश आलं आहे. दिल्लीच्या पथकाने महाराष्ट्रात येऊन कारवाई केल्यामुळे विरोधकांनी राज्य सरकार आणि पोलिसांवर निशाणा साधला आहे. भाजप नेते आशीष शेलार यांनी या प्रकरणात ठाकरे सरकारच्या पोलिसांच्या वापराबाबत आणि अधिकाराबाबत टीका केली आहे.


हेही वाचा – terrorist arrest : केंद्रीय मंत्र्यांना अटक, नेत्यांविरोधात कारवाई करण्यात ठाकरे सरकार मग्न, शेलारांचे टीकास्त्र


 

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -