नवी दिल्ली – स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवावर असे अनेक फोटो समोर आले आहेत, जे ‘हर घर तिरंगा’ मोहिमेबद्दल लोकांचा उत्साह दाखवत आहेत. समोर आलेल्या अशाच एका फोटोमध्ये एक महिला लोखंडी टाकीवर उभी राहून तिरंगा फडकवण्याचा प्रयत्न करत आहे, तर एक वृद्ध व्यक्ती टाकी सांभाळून या महिलेच्या सुरक्षेची काळजी घेत आहे. “स्वातंत्र्यदिनी एवढा गोंधळ का” असा प्रश्न उपस्थित करणाऱ्यांना उत्तर म्हणून प्रसिद्ध उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी एक छायाचित्र शेअर केले आहे. आनंद महिंद्रा यांनी शेअर केलेल्या छायाचित्रात, लोखंडी टाकीशेजारी एक छोटासा हिरवा स्टूल आहे, ज्यावरून ती महिला लोखंडी टाकीवर चढली. या वयोवृद्ध जोडप्याने राष्ट्रध्वज फडकवण्यासाठी किती मेहनत घेतली हे फोटोवरून दिसत आहे.
महिंद्रांच्या ट्वीटमध्ये काय –
महिंद्रा यांनी या चित्रासोबत, स्वातंत्र्यदिनी एवढा गदारोळ का होतो असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर या दोघांना विचारा. ते दोघेही कोणत्याही व्याख्यानापेक्षा चांगले समजावून सांगतील. जय हिंद.” या पोस्टला 1.5 लाखांहून अधिक लोकांनी लाईक केले आहे आणि 13 हजारांहून अधिक लोकांनी ते रिट्विट केले आहे. आनंद महिंद्रा यांच्या या ट्विटवर काही लोकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.
If you ever were wondering why such a fuss over Independence Day, just ask these two people. They will explain it better than any lecture can. Jai Hind. 🇮🇳 pic.twitter.com/t6Loy9vjkQ
— anand mahindra (@anandmahindra) August 14, 2022
काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत लोकांनी फडकवला तिरंगा ध्वज –
विशेष म्हणजे, स्वातंत्र्याच्या 75 वर्षांच्या स्मरणार्थ, सरकारने प्रथमच लोकांना त्यांच्या घरी ध्वज फडकावण्याची परवानगी दिली आहे. ‘हर घर तिरंगा’ मोहिमेसाठी ध्वज कायद्यातही बदल करण्यात आले आहेत. काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत, स्वातंत्र्यदिनी सर्वत्र देशभक्तीचा भाव दिसून आला. यंदाचा हा स्वातंत्र्यदिन खास बनवून विविध राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या सांस्कृतिक, नैसर्गिक आणि धार्मिक वारशाचे दर्शन घडविणाऱ्या इमारती आणि लाल किल्ल्याच्या भिंती सजवण्यात आल्या होत्या. इंडो-तिबेट सीमा पोलिसांच्या जवानांनी आज मिशन ‘अमृतरोहण’चा एक भाग म्हणून एकाच वेळी ७५ शिखरांवर चढाई केली आणि त्या ७५ शिखरांवर राष्ट्रध्वज फडकवला.