घरमहाराष्ट्रदेहू, आळंदी प्रस्थान सोहळ्यासाठी प्रत्येकी १०० वारकर्‍यांना परवानगी

देहू, आळंदी प्रस्थान सोहळ्यासाठी प्रत्येकी १०० वारकर्‍यांना परवानगी

Subscribe

आषाढी वारीसाठी नियमावली जाहीर

यंदा मानाच्या दहा पालखी सोहळ्यांच्या आषाढी वारी सोहळ्यास परवानगी देण्यात आली असून यावर्षी देहू आणि आळंदी येथील प्रस्थान सोहळ्यासाठी प्रत्येकी १०० तसेच उर्वरीत आठ सोहळ्यासाठी प्रत्येकी ५० वारकर्‍यांना प्रस्थान सोहळ्यात सहभागी होता येईल, असे आपत्ती व्यवस्थापन, मदत आणि पुनर्वसन विभागाने मंगळवारी स्पष्ट केले.

गेल्यावर्षी मंदीर खुले करण्याबाबत जी स्थिती होती तीच कायम राहील. तसेच या सोहळ्यासाठी आयोजनाबाबत एखादी बाब राहून गेल्यास त्या बाबी संदर्भात मागील वर्षी जो निर्णय घेण्यात आला होता तोच निर्णय यंदाही घेण्यात यावा, असे आपत्ती व्यवस्थापन, मदत आणि पुनर्वसन विभागाने काढलेल्या आदेशात नमूद केले आहे.

- Advertisement -

पंढरपूरच्या आषाढी वारीसंदर्भातील मंगळवारी नियमावली जाहीर करण्यात आली. यंदाच्या आषाढी वारीचे आयोजन करताना कोरोनाच्या प्रतिबंधासाठी केंद्र आणि राज्य सरकारने वेळोवेळी निर्गमित केलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन होईल याची दक्षता घ्यावी, असे विभागाने निमावलीत नमूद केले आहे. मानाच्या पालखी सोहळ्यांना पायी वारी प्रस्थान ठिकाणापासून विशेष वाहनाद्वारे वाखरी येथे पोहोचल्यानंतर तेथून पंढरपूरकडे दीड किमी अंतर प्रातिनिधिक स्वरूपात पायीवारी करण्यास परवानगी देण्यात आली आहे.

सर्व मानाच्या पालखी सोहळ्यांचे पंढरपूरमध्ये दशमीच्या दिवशी आगमन होऊन पैार्णिमेच्या दिवशी प्रस्थान करण्यास मान्यता देण्यात आली आहे. शासकीय महापूजा आणि विठ्ठल संतांच्या भेटीस गेल्यावर्षी प्रमाणे मान्यता देण्यात आली आहे. तर ‘श्रीं’चे नित्योपचार परंपरेनुसार सुरू ठेवून आषाढी यात्रा कालावधीमध्ये भाविकांसाठी दर्शन बंद ठेवण्यात येईल. तर संत भानुदास महाराज यांच्या पुण्यतिथीसाठी दोन अधिक दोन असे एकूण चार व्यक्तींच्या उपस्थितीत साध्या पद्धतीने साजरा करण्यास आणि श्री. विठ्ठलाच्या पादुकांची मिरवणूक १ ते १५ व्यक्तीसह साध्या पद्धतीने साजरी करण्यास परवानगी देण्यात आली आहे.

- Advertisement -

वारकरी संख्येच्या निकषानुसार संतांच्या पादुका भेटीसाठी, मानाच्या पालखीसाठी ४० वारकर्‍यांना परवानगी देण्यात आली आहे. यावर्षी दोन बस आणि प्रत्येकी बसमध्ये २० प्रमाणे ४० संख्या निश्चित केली आहे.गोपाळकालासाठी मानाच्या पालखी सोहळयाला १ अधिक १० या प्रमाणात गोपाळपूर येथे भजन आणि कीर्तनास परवानगी देण्यात आली आहे. आषाढी एकादशी दिवशी २० जुलै २०२१ रोजी स्थानिक महाराज अशा १९५ मंडळींना श्री विठ्ठल रूक्मिणीमातेचे मुखदर्शन घेण्यास परवानगी देण्यात आली आहे. याबाबत त्यांना वेळ आणि प्रवेशपत्रिका देण्याबाबतची कार्यवाही मंदिर समितीने करावयाची आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -