घरमहाराष्ट्रनिवडणूक चिन्ह कायद्यावर सुप्रीम कोर्टाने आपल्या निर्णयाचे पुनरावलोकन करावे, प्रकाश आंबेडकरांची प्रतिक्रिया

निवडणूक चिन्ह कायद्यावर सुप्रीम कोर्टाने आपल्या निर्णयाचे पुनरावलोकन करावे, प्रकाश आंबेडकरांची प्रतिक्रिया

Subscribe

शिवसेनेवर शिंदे गटाने केलेल्या दाव्याची सुनावणी करण्यास सुप्रीम कोर्टाने परवानगी दिली आहे. यानंतर अनेक प्रतिक्रिया उमटत आहेत. शिंदे गटाच्या सुनावणीमुळे सर्वोच्च न्यायलयाने समोर आलेली एक चांगली संधी गमावल्याची प्रतिक्रिया वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केली आहे. निवडणूक चिन्ह कायद्यातील कलम 15 संविधानाच्यादृष्टीने योग्य आहे की नाही हे तपासता आले असते. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने ही संधी गमावली असल्याचे प्रकाश आंबेडकर म्हणाले.

यावर मंगळवारी झालेल्या सुनावणीत सुप्रीम कोर्टाने शिवसेनेच्या निवडणूक चिन्हाबाबतची सुनावणी करण्यास निवडणूक आयोगाला परवानगी दिली. यावर वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.  यावेळी शिवसेनेच्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाचा हा निर्णय सर्वानाच बंधनकारक आहे. मात्र, या निर्णयाचा आदर राखला जाईल का या बाबत शंका असल्याचे त्यांनी सांगितले. संविधानाने आणि संसदेने निवडणूक आयोगाची तटस्थता जपली होती. त्यांच्यावर शिंतोडे उडवले जाणार नाही याची दक्षता घेतली होती. मात्र, निवडणूक आयोगाने स्वतःच्याच अधिकाराखाली ‘निवडणूक चिन्ह कायदा’ (Election Symbol Order,1968) तयार केला. त्यामध्ये Section 15 प्रमाणे एखाद्या पक्षात जर निवडणूक चिन्हावरून विवाद असेल तर आम्हाला हस्तक्षेप करता येतो, अशी तरतूद केली असल्याचे वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर म्हणाले.

- Advertisement -

पुढे त्यांनी हे Election Symbol Order मधील section 15 संविधानिक आहे की नाही याची तपासणी करण्याची संधी सर्वोच्च न्यायालयाला यानिमित्ताने आली होती. मात्र, दुर्दैवाने ही बाब तपासली गेली नाही. त्यामुळेच निवडणूक आयोगाला शिवसेनेच्या प्रकरणात निर्णय घेण्याची सूचना करण्यात आली. संविधानाने आणि संसदेने निवडणूक आयोगाची तटस्थता जपली होती. दुर्देवाने या निर्णयामुळे ती धोक्यात आली असल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले. यापुढे पक्षातील वादावर निवडणूक आयोग निर्णय घेणार, हा संदेश या निर्णयातून गेला आहे तो चुकीचा आहे असे आपण मानत असल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले. या निर्णयामुळे निवडणूक आयोगाला Frankenstein  करायला निघालो आहोत का अशी शक्यता निर्माण होत असल्याची शंका त्यांनी व्यक्त केली. सुप्रीम कोर्टाने आपल्या निर्णयाचे पुनर्विलोकन करावे अशी विनंतीही आंबेडकर यांनी यावेळी केली.

Ajinkya Desai
Ajinkya Desaihttps://www.mymahanagar.com/author/ajinkyadesai/
मागील 4 वर्षापासून डिजिटल मिडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -