देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला पराभूत करण्यासाठी दुबई किंवा सैदीहून माणसं आणा. हवं तर मेलेल्यांना जागे करा, असे वक्तव्य काँग्रेसचे माजी नगरसेवक उस्मान हिरोली यांनी केले. काल पुण्यात महाविकास आघाडीचे उमेदवार रविंद्र धंगेकर यांच्या प्रचारासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत अल्पसंख्याकांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात भाषण करताना उस्मान हिरोलींनी वक्तव्य केले. त्यांच्या या वक्तव्याचा व्हिडीओ शेअर करत भाजपाने टीका केली. (Pune Kasba Bypoll Election Bjp Keshav Uhadhye Objection Over Congress Leader Usman Hiroli)
भाजपाचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी हा व्हिडीओ ट्विट केला आहे. या ट्विटमध्ये त्यांनी “मोदी आणि संघाला पराभूत करण्यासाठी दुबईवरुन लोक आणा, सौदीवरून लोक आणा, मेलेले आहेत त्यांना हजर करा, ही विधान आहेत, शरद पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या अल्पसंख्याक बैठकीत काँग्रेसचे माजी नगरसेवक उस्मान हिरोली यांचे. बोगस मतदान घडविण्याची योजना पणे आखली जात आहे”, असे म्हटले. तसेच, या प्रकारणाची निवडणूक आयोगाला दखल घ्यावी अशी मागणीही त्यांनी केली आहे.
#Modi, #Rss ला पराभूत करण्यासाठी #दुबई वरुन लोक आणा, सौदी वरून लोक आणा
मेलेले आहेत त्यांना हजर करा, ही विधान आहेत @PawarSpeaks उपस्थितीत झालेल्या अल्पसंख्याक बैठकीत. कॅाग्रेसचे माजी नगरसेवक उस्मान हिरोली यांचे. बोगस मतदान घडविण्याची योजना पणे आखली जात आहे @ECISVEEP
दखल घ्यावी pic.twitter.com/HWMs1UCiZL— Keshav Upadhye (@keshavupadhye) February 23, 2023
नेमके काय म्हणाले उस्मान हिरोली?
“२६ तारखेला मतदान आहे.आपले लोक दुबई किंवा सौदीला गेलेले असतील त्यांना हजर करा.एवढंच नाही तर मेलेल्यांनाही हजर करा, तेव्हाच हे युद्ध जिंकता येईल”, असे वक्तव्य त्यांनी मेळाव्यात केल्याची जोरदार चर्चा सोशल मिडियावर होते आहे.
दरम्यान, कसबा विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीचा प्रचार शेवटच्या टप्प्याकडे जात असताना या निवडणुकीतल्या दोन्ही पक्षांकडून एकमेकांना लक्ष्य केले जात आहे. या निवडणुकीत भाजपाचे हेमंत रासने विरुद्ध महाविकास आघाडीचे रविंद्र धंगेकर असा थेट सामना होणार आहे. दोन्ही बाजूंनी पक्षाच्या मान्यवर नेत्यांना प्रचारात उतरवले जात आहे. एकूणच रॅली, प्रचार सभा, बैठका आणि मेळाव्यांमुळे इथले वातावरण तापले आहे.
हेही वाचा – तुम्ही केलेल्या संघर्षाला यश.., एमपीएससीच्या विद्यार्थ्यांना पवारांनी दिल्या शुभेच्छा