घरमहाराष्ट्रया मानसिक विकृतीला वेळीच आवर घाला - राज ठाकरे

या मानसिक विकृतीला वेळीच आवर घाला – राज ठाकरे

Subscribe

विचारांचा मुकाबला विचारांनी करायचा असतो. एखादा हलका विनोद वगैरे आपण समजू शकतो. त्यातली विनोदबुद्धीही आपण ओळखतो. तशा टीका महाराष्ट्राला नव्या नाहीत. आमचे शरद पवार यांच्याशी मतभेद जरूर आहेत आणि राहतील. पण अशा घाणेरड्या पातळीवर येणे साफ चूक आहे. पवारांविषयी असे लिहिणे ही एक प्रवृत्ती नव्हे, तर मानसिक विकृती आहे. तिला वेळीच आवर घालायला हवा, अशा संतप्त शब्दात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अभिनेत्री केतकी चितळेने लिहिलेल्या फेसबुक पोस्टवर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

पोस्ट लिहिणार्‍या व्यक्ती या खरेच आहेत की नवा वाद उकरून काढण्यासाठी कुणाची तरी उठाठेव सुरू आहे हे देखील तपासणे गरजेचे आहे. कारण या अशाच चार-दोन विकृत टाळक्यांमुळे समाजा-समाजामध्ये तेढ निर्माण होते. समाज दुभंगतो. द्वेषाची पातळी किती खालपर्यंत आली आहे हे आता राज्यकर्त्यांनाही समजले असेलच. हे सगळे महाराष्ट्रात वेळीच आवरणे गरजेचे आहे. कारण महाराष्ट्राची ओळख वेगळी आहे. म्हणूनच राज्य सरकारने याचा नीट छडा लावून या गोष्टींचा ताबडतोब बंदोबस्त करावा, अशी मागणीही राज ठाकरे यांनी केली आहे.

- Advertisement -

अभिनेत्री केतकी चितळे हिने फेसबुकच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर आक्षेपार्ह भाषेत टीका केली आहे. यानंतर राज्यभरातून संतप्त भावना व्यक्त होत आहेत. या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी शनिवारी एक पत्र ट्विट करून या पोस्टचा निषेध केला आहे. कुणीतरी केतकी चितळे नामक व्यक्तीने अतिशय खालच्या पातळीवर जाऊन घाणेरड्या शब्दांत काहीतरी श्लोकासारखे लिहून फेसबुकवर पोस्ट प्रकाशित केलेली आमच्या निदर्शनास आणली गेली. खाली काहीतरी भावे वगैरे असे नाव टाकले आहे. या लिखाणाला महाराष्ट्र संस्कृतीत जागा नाही. त्याचा आम्ही तीव्र शब्दांत निषेध करतो, असे राज ठाकरे यांनी म्हटले आहे. चांगल्याला चांगले आणि वाईटाला वाईट म्हणणे हेच आजपर्यंत आपल्या महाराष्ट्रातल्या महापुरुषांनी, संतांनी तसेच असंख्य बुद्धीमान विचारवंतांनी आपल्याला शिकवले. कुणीही या राज्याची परंपरा खालच्या पातळीवर नेऊ नये, अशी अपेक्षा राज ठाकरे यांनी व्यक्त केली आहे.

मी पूर्वीचा जितेंद्र आव्हाड असतो तर …

- Advertisement -

केतकीच्या या पोस्टवर गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी संताप व्यक्त केला आहे.‘डिपार्टमेंट, पद प्रतिष्ठा, मंत्रिपद हे बापापुढे मोठं नाही. त्या बापाला गोळी मारा असं कोणी म्हणत असेल, तर मी पूर्वीचा जितेंद्र आव्हाड असतो, तर आतापर्यंत वेगळ्याच प्रतिक्रिया दिल्या असत्या’, अशी संतप्त प्रतिक्रिय आव्हाड यांनी दिली. ‘एक वेडा कार्यकर्ता भयंकर काहीतरी करू शकतो. त्याचं आपल्या आई-बापाप्रमाणे पवार साहेबांवर प्रेम आहे. तो हे सहन नाही करणार’, असा इशाराही आव्हाडांनी दिला आहे.

आता कायदा त्याचे काम करेल
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही केतकीला फटकारले आहे. कुठल्याही ज्येष्ठ नेत्याबाबत काय भाषा वापरतो याचे भान असले पाहिजे. अलीकडे सोशल मीडियावर खालची भाषा वापरली जाते. खालच्या भाषेत टीका केली जाते. अशा प्रकारचे शब्द कुणीही वापरू नये. आता कायदा त्याचे काम करेल, असे फडणवीस म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -