पीएफआय संघटनेच्या राज्यस्तरीय नेत्यांना केंद्रीय तपास यंत्रणेकडून अटक केल्याच्या निषेधार्थ आंदोलन करणाऱ्या ६० हून अधिक जणांवर पुणे पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. काल पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर आंदोलन करण्यात आले होते. दरम्यान या प्रकरणी बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परंतु या प्रकरणी आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे आक्रमक झाले असून या देशातील हिंदू बांधव गप्प बसणार नाहीत, असा इशारा त्यांनी दिला आहे.
माझी केंद्रातील, राज्यातील गृहमंत्र्यांना विनंती आहे की, ‘पाकिस्तान झिंदाबाद, अल्लाहू अकबर’अशा घोषणा हिंदुस्थानात दिल्या जाणार असतील तर… आता ह्या देशातील हिंदू बांधव गप्प बसणार नाहीत. त्यापेक्षा ही कीड समूळ नष्टच करा, ह्यातच हिंदुस्थानाचं हित आहे, असं ट्वीट राज ठाकरेंनी केलं आहे.
माझी केंद्रातील, राज्यातील गृहमंत्र्यांना विनंती आहे की, ‘पाकिस्तान झिंदाबाद, अल्लाहू अकबर’ अशा घोषणा हिंदुस्थानात दिल्या जाणार असतील तर… आता ह्या देशातील हिंदू बांधव गप्प बसणार नाहीत. त्यापेक्षा ही कीड समूळ नष्टच करा, ह्यातच हिंदुस्थानाचं हित आहे. @AmitShah @Dev_Fadnavis pic.twitter.com/BB88mEZ8hr
— Raj Thackeray (@RajThackeray) September 24, 2022
एनआयएने छापे घातले आणि पीएफआय पदाधिकाऱ्यांना, कार्यकर्त्यांना अटक केली, म्हणून पुण्यात या संघटनेच्या कार्यकर्त्यांनी, ‘पाकिस्तान झिंदाबाद, अल्लाहू अकबर’अशा घोषणा दिल्या, सरकारने यांना वेळीच ठेचलं पाहीजे, असं ठाकरे म्हणाले.
ही अटक कशासाठी झाली?, तर दहशतवाद्यांना आर्थिक मदत करणे, त्यांची प्रशिक्षण शिबिरं आयोजित करणे, ह्या गंभीर आरोपांखाली…थोडक्यात देशद्रोही कृत्यांसाठी. तरीही या देशद्रोह्यांचं समर्थन करत जर या पीएफआयच्या कार्यकार्त्यांना त्यांचा धर्म आणि पाकिस्तान आठवत असेल,तर तुमचा धर्म घ्या आणि पाकिस्तानात चालते व्हा, ही थेरं आमच्या देशात चालणार नाहीत, असं ठाकरेंनी म्हटलंय.
हेही वाचा : पीएफआयच्या निशाण्यावर होते पंतप्रधान नरेंद्र मोदी, ईडीचा दावा