घरमहाराष्ट्रआता तलवारीला तलवारीने उत्तर

आता तलवारीला तलवारीने उत्तर

Subscribe

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या महामोर्चात राज ठाकरेंचा एल्गार

देशात आज ज्यांनी मोर्चे काढले त्यांना मी सांगतो मोर्चाला मोर्चाने उत्तर मिळाले आहे. यापुढे दगडाला दगडाने आणि तलवारीला तलवारीने उत्तर दिले जाईल, असा इशारा बांगलादेश, पाकिस्तानी घुसखोरांना देतानाच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नागरिकत्व दुरुस्ती कायदा (सीएए) आणि नागरिकत्व नोंदणी कायद्याचे (एनआरसी) जोरदार समर्थन केले. आमचा मराठी मुस्लिम जेथे राहतो तेथे दंगलीच होत नाहीत, असेही त्यांनी यावेळी ठणकावून सांगितले.

गिरगाव चौपाटीवरील हिंदू जिमखान्यापासून मोर्चाला सुरुवात झाली. मनसे अध्यक्ष राज ठाकरे दुपारी तीन वाजता सहभागी झाले. यानंतर राज ठाकरेंनी आझाद मैदानात भाषण केले. यावेळी त्यांनी हा मोर्चा का काढण्यात आला? याचा उद्देश काय, हे आपल्या भाषणातून जाहीर केले.

- Advertisement -

राज ठाकरे म्हणाले की, काही हिंदू आहेत, किंवा इतर आपल्या राज्यातील आहे. त्यांच्याकडे पुरावे नाहीत. त्यांच्याकडे कशासाठी पुरावे मागायचे. ते येथीलच आहे. मात्र, घुसखोरांची सफाई होण्यासाठी कुठून तरी सुरुवात केली पाहिजे. राज्याला सांगून उपयोग नाही. केंद्राला सांगतो माझ्या मुंबईतील पोलिसांना 48 तास द्या, ते महाराष्ट्रातील गुन्हे शून्य टक्क्यावर आणतील, असेही राज ठाकरे यावेळी म्हणाले.

अनेकांना कायदाच माहित नाही
अनेकांना सीएए, एनआरसी कायदा काय आहे याची माहितीही नाही. आज जो कायदा केला आहे त्यात पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि बांगलादेश येथे जर धार्मिक अल्पसंख्यांकांवर अन्याय झाला तर त्यांना भारत नागरिकत्व देईल. 1955 चा हा कायदा आहे. फाळणी झाल्यानंतर 1955 ला हा कायदा झाला. त्यावेळची परिस्थिती वेगळी होती. आज 2000 मधील परिस्थिती वेगळी आहे. तो देश त्यावेळी भारतापासून वेगळा झाला होता. मात्र, आज त्या देशाची काय अवस्था आहे, असा सवाल राज ठाकरे यांनी केला.

- Advertisement -

डावीकडे किंवा उजवीकडे
एकतर उजवीकडे राहा किंवा डावीकडे राहा अशी सध्या परिस्थिती आहे. केंद्राने काही वाईट केले आणि त्यावर टीका केली तर ते भाजपविरोधात आणि केंद्राकडून काही चांगले निर्णय झाले आणि कौतुक केले तर ते भाजपकडून असे बोलतात, असा टोलाही राज ठाकरेंनी लगावला

पाक दहशतवादाचा अड्डा
जेव्हा भाजपने चांगले निर्णय घेतले तेव्हा त्यांचे कौतुक केले. एकतर इकडचे किंवा तिकडचे असं झालं आहे. सीएए फक्त चार ओळीचं आहे. प्रश्न पाकिस्तानच्या परिस्थितीचा आहे. आज पाकिस्तान दहशतवाद्यांचा अड्डा झाला आहे, असेही राज ठाकरे म्हणाले.

बॉम्बस्फोटामागे कोण?
देशात अनेक बॉम्बस्फोट झाले. त्यात अनेक माणसे मारली गेली. या सर्व बॉम्बस्फोटामागे कोण होत? आज मुंबईत 1992-93 मध्ये बॉम्बस्फोट झाले ते दाऊदने केले. त्याला पाकिस्तान सांभाळत आहे. तिकडच्या हिंदू अल्पसंख्यांकांवर अन्याय झाला तर त्यांना नागरिकत्व दिलं जात आहे. तिकडच्या मुस्लिमांना कसे घेणार? एक आंतरराष्ट्रीय करारानुसार अल्पसंख्यांकांना घ्यावे लागते, असे राज ठाकरे यांनी स्पष्ट केले.

माझा देश धर्मशाळा नाही
माझा देश म्हणजे काय धर्मशाळा वाटली का यांना. कुठल्याही देशातील लोकांनी यायचे, कुठेही राहायचे. या देशात पाण्याचा, आरोग्याचा आणि शिक्षणाचा प्रश्न आहे हेही मला माहिती आहे. मात्र, घुसखोरांचाही प्रश्न तितकाच मोठा आहे. भारताने माणुसकीचा ठेका घेतलेला नाही. आज जगभरात घुसखोरांवर कारवाई सुरु आहे.

ताकद कोणाला दाखवता?
मी सांगितले होते मोर्चाला उत्तर मोर्चाने. आज तुम्ही त्यांना चोख उत्तर दिले. काल कुणीतरी पसरवले की मी 11 वाजून 55 मिनिटांनी इथे येणार आहे. मी काही ट्रेन आहे का? मोर्चा आहे, गाड्या यायला वेळ लागतो. पक्षाचे अधिवेशन झाले आणि त्यात मी जाहीर केले होते की देशभरात जे मोर्चे निघाले, खास करुन मुस्लिमांनी जे मोर्चे काढले याचे अर्थच मला कळाले नाही. जे जन्मापासून वर्षांनूवर्षे येथे राहिले त्यांना देशातून बाहेर कोण काढून देणार होते? तसे कायद्यातच नाही, मग त्यांनी ताकद कुणाला दाखवली? असा प्रश्नही राज ठाकरेंनी उपस्थित केला.

देशात मोठे षड्यंत्र सुरू आहे                                                                                                  पोलिसांवर हात टाकायला यांची हिंमत होती. आता यांच्यावर हात टाकायला किती वेळ लागेल? त्यावेळी रझा अकादमीच्या लोकांनी पोलिसांवर हल्ला केला. त्यावेळी या ठिकाणी बांगलादेशी माणसाचा पासपोर्ट सापडला. फक्त बांगलादेशातून 2 कोटी लोक आले आहेत. इतर ठिकाणी किती आले याची माहिती नाही. आम्ही फक्त दंगल झाली की हिंदू असतो. आज त्यांचे मोठे षड्यंत्र सुरु आहे. एक जागा आहे जिथे परदेशातील मुल्ला मौलवी येत आहेत. मी याची माहिती गृहखात्याला देणार आहे. पोलिस खात्यातूनच मला ही माहिती मिळाली आहे, असेही राज ठाकरे म्हणाले.

मराठी मुस्लिमाच्या दंगली नाहीत
पुण्यात एका बांगलादेशी माणसाने मराठी नाव लावलं, मराठी कुटुंबातील मुलीशी लग्न केलं. नंतर कळालं तो बांगलादेशी आहे. मराठी माणसांमुळे कधीही दंगली झाल्या नाहीत कारण तो इथला आहे. मात्र, आज भारतात असे अनेक भाग आहेत. तेथे बाहेरील देशातील मुस्लिम आहेत. मुस्लिमच काय पण नायजेरियाचे लोकही आले आहेत. ते ड्रग्ज विकतात, मुलींची छेड काढतात. आम्ही फक्त षंडासारखं बघत बसायचे. जेथे माझा मराठी मुस्लिम राहतो तेथे दंगली होत नाहीत, असेही राज ठाकरे यांनी ठणकावून सांगितले. आज माझे केंद्र सरकारला हेच सांगणे आहे. जर तुम्ही देशातील आर्थिक प्रश्नांकडे दुर्लक्ष व्हावे हणून हे कायदे आणणार असेल तर ते चुकीचे आहे. हे कायदे करणार असाल, तर त्याची कठोर अंमलबजावणी करा,

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -