राज्यात महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यापासून विरोधी पक्ष सातत्याने सरकार पडणार अशी भविष्यवाणी करीत आहेत. आज रिपाइंचे प्रमुख आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी देखील आता तजकरे सरकारबद्दल वक्तव्य केलं आहे. जोपर्यंत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस सरकार चालू देतील तोपर्यंत हे सरकार चालणार, असं रामदास आठवले यांनी म्हटलं आहे. ते इंदापूर इथे बोलत होते.
रामदास आठवले हे आज पंढरपूर विधानसभेच्या पोटनिवडणुकीच्या प्रचारासाठी आले आहेत. दरम्यान, प्रचाराला जाण्यापूर्वी पुणे जिल्ह्यातील इंदापूर येथील शासकीय विश्रामगृह येथे काही वेळ थांबले होते. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधत असताना ठाकरे सारकरबाबत वक्तव्य केलं. राज्यातील ठाकरे सरकार अजून किती दिवस टिकेल असा प्रश्न पत्रकारांनी रामदास आठवले यांना विचारला. त्यावर उत्तर देताना हे सरकार जोपर्यंत देवेंद्र फडणवीस चालू देतील तोपर्यंत चालेल, असा दावा केला आहे. यावेळी त्यांनी सचिन वाझे प्रकरणामुळे महाराष्ट्राची देशभर बदनामी झाली आहे, असं आठवले म्हणाले.
पंढरपूर पोटनिवडणूक
राष्ट्रवादीचे आमदार भारत भालके यांचं निधन झाल्याने पंढरपूरमध्ये पोटनिवडणूक लागली आहे. राष्ट्रवादीकडूनramdas atha ki भारत भालके यांचे चिरंजीव भगीरथ भालके यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर भाजपकडून समाधान आवताडे हे निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.