घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रदिलासा! १५ दिवसांत शेतकर्‍यांना नुकसान भरपाई; कृषीमंत्री सत्तारांची घोषणा

दिलासा! १५ दिवसांत शेतकर्‍यांना नुकसान भरपाई; कृषीमंत्री सत्तारांची घोषणा

Subscribe

नाशिक : राज्यातील शेतकरी अनेक संकटावर मात करीत वाटचाल करीत असताना राज्य शासनाच्या वतीने वेळोवेळी मदत करण्यात येत आहे, यंदा अवकाळी पाऊस, गारपीट, चक्रीवादळ ढगफुटी यासारख्या अनेक संकटांनी शेतकरी हवालदिल झाला आहे. मात्र सरकार शेतकरयांच्या पाठीशी भक्कमपणे उभे असून विविध प्रकारच्या नैसर्गिक संकटांसाठी सुमारे १२ हजार कोटी रुपयांची नुकसान भरपाई शेतकर्‍यांना देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. येत्या पंधरा दिवसांत सर्व मदतीचे वाटप करण्यात येईल अशी घोषणा राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी केली.

ह्युमन सर्व्हिस फाउंडेशन व मीडिया एक्झिबिटर्स प्रा.लि. यांच्या संयुक्त विद्यमाने ‘कृषीथॉन’ प्रदर्शनाचे ठक्कर डोम येथे आयोजन करण्यात आले आहे. कृषीथॉन प्रदर्शनाच्या तिसर्‍या दिवसाच्या पहिल्या सत्रात कृषी सेवा केंद्र पुरस्कार वितरण प्रसंगी कृषीमंत्री अब्दुल सत्तार बोलत होते. याप्रसंगी आमदार दिलीप बनकर, आमदार सीमा हिरे, नाडाचे उपाध्यक्ष अरुण मुळाणे, नाडाचे सचिव लक्ष्मीकांत जगताप, नाडाचे खजिनदार मंगेश तांबट, कृषी विभागाचे सहसंचालक मोहन वाघ, कृषी विभागाचे जिल्हा अधिक्षक विवेक सोनवणे, चंद्रकांत ठक्कर, प्रभाकर पाटील उपस्थित होते. यावेळी बोलतांना मंत्री सत्तार म्हणाले, देशातील तसेच राज्यातील शेतकरी हा आपला अन्नदाता आहे. शेती क्षेत्रात नवक्रांती घडविण्यासाठी शेतकरी प्रयत्न करत असून त्याला कृषीथॉनसारख्या प्रदर्शनाची जोड मिळत आहे, ही अत्यंत समाधानाची आणि कौतुकाची बाब आहे.

- Advertisement -

सध्या राज्यातील शेतकरी अनेक अडचणीतून जात आहे, तरीही राज्य शासनाच्या वतीने त्याला मदत करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. शेतकर्‍यांच्या विकासासाठी अत्यंत मार्गदर्शक ठरणारे कृषीथॉन प्रदर्शनाचे आयोजक संजय न्याहारकर व त्यांचा परिवार हे गेल्या २४ वर्षांपासून करीत असून दरवर्षी कृषीथॉन हे भव्य प्रदर्शन आयोजित करत आहेत, आमच्या मराठवाड्यासारख्या मागास भागाला देखील अशा प्रकारे प्रदर्शन भरविण्याची गरज असून हे प्रदर्शन आमच्यासाठी प्रेरणादायी आणि मार्गदर्शक ठरणारे आहे, असेही सत्तार म्हणाले. मान्यवरांचे स्वागत आयोजक साहिल न्याहारकर आणि अश्विनी न्याहारकर यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आदित्य तुपे यांनी केले. आभार प्रदर्शन हरीश मोरे यांनी केले. कार्यक्रमास नाशिक शहरातील कृषी संबधित उद्योग आणि व्यवसाय क्षेत्रातील विविध मान्यवर जिल्ह्यासह राज्यभरातील शेतकरी, विद्यार्थी व नागरिक उपस्थित होते.

आदर्श कृषी सेवा केंद्र पुरस्काराचे वितरण

यावेळी कृषीमंत्र्यांच्या हस्ते आदर्शन कृषी सेवा केंद्र पुरस्काराचे वितरण करण्यात आले. यात प्रभाकर पाटील ( पाटील ब्रदर्स, नाशिक ), विष्णूपंत धुमाळ ( श्री स्वामी समर्थ फर्टीलायझर्स फर्टीलायझर्स, दिंडोरी ), संजय निकम (शिवनेरी कृषी सेवा केंद्र, मालेगाव ) रावसाहेब माळोदे ( विवेकशील अ‍ॅग्रो मार्ट, निफाड ), संदीप राजवळ (यश अ‍ॅग्रो एजन्सी पिंपळगाव बसवंत ), भाऊसाहेब बिन्नर ( न्यू कन्हैया अ‍ॅग्रो सर्विसेस, घोटी इगतपुरी ), राजेंद्र मोरे (नवनाथ कृषी सेवा केंद्र, कळवण ), गोविंदराव पाटील (कमल कृषी सेवा केंद्र, नांदगाव ), धनंजय निकम ( निसर्ग अ‍ॅग्रो केमिकल, मालेगाव ), बस्तीराम थेटे प्रगत अ‍ॅग्रो सर्विसेस, गिरणारे – नाशिक ) विजय पाटील (सारजाई फर्टीलायझर्स पिंपळकोठे सटाणा ), बापू गुंजाळ ( कृषी कल्याणी फळबागा उत्पादक संस्था देवळा सटाणा ) शक्ती दळवी (न्यू महादेव अ‍ॅग्रो एजन्सी लखमापूर सटाणा ), संजयशेठ उगले (साई कृषी सेवा केंद्र फर्दापुर सिन्नर ), राजेंद्र काळे (संत यादव स्वामी फर्टीलायझर्स चांदवड ), राधिका वाकचौरे (सद्गुरु कृषी सेवा केंद्र अंदरसुल येवला ) तसेच नाडातर्फे महेंद्र बोरा (वणी ), नितीन काबरा ( येवला ), विश्वास कवडे (नांदगाव ), नरेंद्र मोरे ( सटाणा ) यांचा सत्कार करण्यात आला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -