घरताज्या घडामोडीसार्क राष्ट्रांना करोनाशी एकत्रितपणे लढण्याची गरज - नरेंद्र मोदी

सार्क राष्ट्रांना करोनाशी एकत्रितपणे लढण्याची गरज – नरेंद्र मोदी

Subscribe

जागतिक आरोग्य संघटनेकडून करोनाला महारोगराई म्हणून घोषित करण्यात आलेले आहे.

जागतिक आरोग्य संघटनेकडून करोनाला महारोगराई म्हणून घोषित करण्यात आलेले आहे. जगभरात आतापर्यंत करोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा हजाराच्या घरात पोहोचला असून या विषाणूची बाधा झालेल्यांचा आकडा लाखात आहे. भारतातही करोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडून योग्य ती खबरदारी घेतल्या जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील या महारोगराईपासून देशाची व जगाची सुटका करण्यासाठी अभियान सुरू केले आहे. या पार्श्वभूमीवर आज त्यांनी व्हिडिओ कॉन्फरंसिंगद्वारे सार्क राष्ट्रांच्या नेत्यांशी चर्चा केली. यावेळी त्यांनी सार्क राष्ट्रांना करोनाशी एकत्रितपणे लढण्याची गरज असल्याचे सांगितले. तसेच, यासाठी आकस्मिक निधी उभा करण्याचे सर्व राष्ट्रांना आवाहन केले असून भारताकडून यासाठी १ कोटी डॉलरचा निधी देण्याचीही मोदींनी तयारी दर्शवली. याशिवाय व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे सुरू असलेल्या या चर्चेत पंतप्रधान मोदींसह श्रीलंका, बांगलादेश, अफगाणिस्तान, मालदीव, भूतान व नेपाळ या राष्ट्रांच्या प्रमुखांचा सहभाग आहे. करोना व्हायरसशी लढण्यासाठी पंतप्रधान मोदींनी सार्क राष्ट्रांना एकत्र करत कोविड-१९ साठी आपत्कालीन निधी तयार करण्याचा प्रस्ताव मांडला.

- Advertisement -

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, आपले समाज एकमेकांमध्ये गुंतलेले आहेत. आपले लोकपातळीवरील संबंध प्राचीन काळापासून आहेत. त्यामुळे आपण सर्वांनी एकजुटीने तयारी करून कृती करून सामूहिक यश प्राप्त करावे. आपल्याला करोनाला घाबरण्याची काही आवश्यकता नाही. तर एकत्र येवून त्याच्याशी लढण्याची गरज आहे. परंतु सार्क राष्ट्रांना सतर्क राहावे लागेल. आतापर्यंत सार्क राष्ट्रांमध्ये १५० पेक्षा कमी व्यक्ती आढळले आहेत. करोनापासून सतर्क राहण्याची आवश्यकता आहे. भारतात जानेवारीपासून स्क्रीनिंग केली जात आहे. करोनाचा धोका पाहता १४०० भारतीयांना जगभरातील विविध देशांमधून परत आणण्यात यश आले आहे. याचबरोबर शेजारील देशाच्या काही नागिराकांना देखील आम्ही मदत केली असल्याचेही पंतप्रधान मोदींनी सांगितले.

- Advertisement -

संकट काळात आपण एकत्र आलो आहोत. कोणतेच राष्ट्र या व्हायरसशी एकटच लढू शकत नाही, यामध्ये सर्वांची मदत हवी आहे. मालदीव नशीबवान आहे, आम्हाला भारताची मदत मिळाली, असे मालदीवचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम सोलिह यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार व्यक्त करताना उद्गार काढले.

श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष गोटबाय राजपक्षे म्हणाले, श्रीलंकेत हा व्हायरस पसरू नये, हेच आमच्यासमोर मोठं आव्हान आहे. श्रीलंकेत परदेशातून परतणाऱ्या नागरिकांना १४ दिवसांसाठी देखरेखीखाली ठेवलं जात आहे. आमच्या देशातील विद्यापीठ व महाविद्यालय बंद ठेवण्यात आले आहेत, अशी माहिती श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष गोटबाय राजपक्षे यांनी दिली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -