राज्यसभेच्या सहा जागांसाठी निवडणूका लागली आहे. 10 जूनला मदान होणार आहे. विधानसभेतील संख्याबळानुसार भाजपचे दोन, शिवसेना काँग्रेस व राष्ट्रवादीचा प्रत्येकी एक असे पाच खासदार निवडून येतील. सहाव्या जागेसाठी चूरस आहे. याजागेसाठी माजी खासदार संभाजीराजे यांनी अपक्ष उमेदवारी जाहीर केली आहे. यावेळी त्यांनी सर्वच पक्षांना पाठिंबा देण्याचा आवाहन केले आहे. या आवाहनाला प्रतिसाद देत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पाठींबा देण्याचे संकेत दिले आहेत. संभाजी राजेंनी राज्यातील सर्व आमदारांना खुले पत्र लिहिले आहे.
आपणास कल्पना आहेच की, महाराष्ट्रातू राज्यसभेच्या सहा जागा रिक्त होत आहेत. या जागांसाठी निडणूक कार्यक्रम जाहीर झालेला आहे. या निवडणुकीत मी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करत आहे. या विडणुकीत विजयी होण्यासाठी कोणत्याही उमेदवाराला विधानसभा सदस्यांच्या 42 मतांची आवश्यकता आहे. महाष्ट्र विधानसभेतील पक्षीय संख्याबळाचा विचारत करता, या सहा जागांपैकी शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेस पक्षांना प्रत्येकी एक व भाजपला दोन जागांवरती विजय मिळवणे शक्य वाटते, उर्वरित एक जागेकरतिता कोणत्याही एका पक्षाकडे परेसे संख्याबळ नाही. करिता, या जागेवरती अपक्ष म्हणून मला संधी देण्यात यावी, असे अवाहन मी सर्व राजकीय पक्षांना व अपक्ष आमदारांना केलेले आहे, असे म्हणत संभाजीराजेंनी पत्राला सुरुवात केली आहे.
या पत्रात पुढे त्यांनी २००७ पासून सामाजिक चळवळींच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रात मी कार्यरत आहे. छत्रपती शिवाजी महाराज व राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी दिलेली शिकवण आचरण करीत मी राजकारण विरहित कार्य करीत आलो आहे. राष्ट्रपतीनियुक्त खासदार असताना देखील कोणत्याही बाबतीत भूमिका घेताना वैयक्तिक राजकीय भवितव्याचा विचार न करता, सदैव समाजाला दिशा देण्याचीच भूमिका घेतली. संसदेत काम करीत असताना महाराष्ट्राच्या व देशाच्या हितासाठी कोणताही पक्षीय अभिनिवेश न बाळगता पक्षविरहित काम केले, असे म्हणत त्यांनी आपल्या कामगिरीचा आढावा घेतला आहे.
महाराष्ट्रातील सर्व विधानसभा आमदारांना खुले पत्र…
प्रति,
सर्व विधानसभा सदस्य,
महाराष्ट्र विधीमंडळआपणांस कल्पना आहेच की, महाराष्ट्रातून राज्यसभेच्या सहा जागा रिक्त होत आहेत. या जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झालेला आहे. या निवडणुकीत मी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करीत आहे. pic.twitter.com/i7Vwu1U7NB
— Sambhaji Chhatrapati (@YuvrajSambhaji) May 17, 2022
छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी छत्रपती शाहू महाराज, महात्मा जोतिबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर व संतांच्या विचारांची बैठक असणारा हा महाराष्ट्र या विचारांवरून ढळू नये, यासाठी रस्त्यापासून ते संसदेपर्यंत मी झटत राहिलो. जनकल्याणालाच नेहमी व एकमेव प्राधान्य दिले. मात्र हे सर्व करताना लोकहिताची कामे करण्यासाठी हाती सत्तापद असणे हे किती सोयीस्कर असते, हे खासदाकीच्या कारकिर्दीत माझ्या लक्षात आले. याचमुळे, राज्यसभेच्या या सहाव्या जागेवर मी दावा करीत आहे. याकरिता मला आपणा सर्वांच्या मदतीची आवश्यकता आहे, असे संभाजी राजेंनी म्हटले आहे.
माझी कारकीर्द व प्रामाणिक कार्यपद्धती पाहता, आपण सर्वजण राज्यसभेच्या या सहाव्या जागेसाठी मला निश्चितच सहकार्य कराल, अशी जाहीर अपेक्षा सदर पत्रान्वये मी व्यक्त करतो, असे म्हणत त्यांनी पत्राचा शेवट केला आहे.