खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी मराठा आरक्षणासाठी आमरण उपोषण सुरु केले आहे. मराठा समाजाच्या मागण्या मागण्या पूर्ण करण्याची मागणी संभाजीराजेंनी केली आहे. संभाजीराजेंच्या उपोषणाचा आज तिसरा दिवस सुरु आहे. संभाजीराजेंती तब्येत बिघडली आहे. त्यांचा रक्तदाब कमी झाला आहे. तसेच साखरेची पातळीत घट झाला आहे. राजेंनी औषध घेण्यास नकार दिला असल्यामुळे काळजी वाढली आहे. डॉक्टरांच्या टीमने तपासणी केल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्याचा सल्ला दिला आहे. डॉक्टरांनी औषध देण्याचा प्रयत्न केला परंतु उपोषणावर ठाम असल्यामुळे राजेंनी स्पष्ट नकार दिला आहे.
खासदार संभाजीराजे छत्रपती यांची डॉक्टरांच्या टीमने सकाळी आरोग्य तपासणी केली. राजेंचा रक्तदाब आणि शरीरातील साखरेचे प्रमाण कमी झाले असल्याने त्यांना तीव्र डोके दुखी होत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. औषध घेण्याचा आणि तात्काळ रुग्णालयात दाखल करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. परंतु उपोषणावर ठाम आहेत. रक्तदाब कमी झाल्यामुळे राजेंच्या ह्रदयाचे ठोके वेगाने कमी होत आहेत. तसेच साखरेची पातळी वाढवण्यासाठी इंजेक्शन देण्याच सल्ला डॉक्टरांनी दिला परंतु राजेंनी त्यालासुद्धा स्पष्ट नकार दिला आहे. डॉक्टरांनी रविवारीच संभाजीराजेंना सलाइन लावण्याचा सल्ला दिला होता परंतु राजे आपल्या भूमिकेवर ठाम आहेत.
उपोषणाचा तिसरा दिवस – स. ०८:२० वा. छत्रपती संभाजीराजे यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. रक्तदाब व शरीरातील साखरेचे प्रमाण कमी झाले असून अशक्तपणा व तीव्र डोकेदुखी ही लक्षणे जाणवत आहेत. यावर कोणत्याही प्रकारची औषधे घेण्यास संभाजीराजेंनी नकार दिला आहे. pic.twitter.com/SZ00Z77ep0
— Sambhaji Chhatrapati (@YuvrajSambhaji) February 28, 2022
मराठा समन्वयक आणि राज्य सरकारमध्ये वर्षावर चर्चा
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी खासदार संभाजीराजे यांना चर्चेचे निमंत्रण दिले आहे. यानंतर मराठा समन्वयक वर्षावर दाखल झाले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आणि मराठा समन्वयक यांच्यामध्ये बैठक सुरु झाली आहे. मराठा आरक्षण आणि राजेंच्या उपोषणावर तोडगा काढण्यात यावा यासाठी राज्य सरकारचे प्रयत्न सुरु झाले आहे. संभाजीराजेंनी सांगितले आहे की, २२ मागण्या असून ६ मागण्या तातडीने मंजूर होऊ शकतात यामुळे त्या मंजूर कराव्यात अशी मागणी संभाजीराजेंनी केली आहे. दरम्यान या बैठकीत तोडगा निघणार का ? याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.