घरमहाराष्ट्रमहाराष्ट्राचे तीन तुकडे करायचा कट, सामनातून बंडखोरांसह भाजपवर टीका 

महाराष्ट्राचे तीन तुकडे करायचा कट, सामनातून बंडखोरांसह भाजपवर टीका 

Subscribe

उद्धव ठाकरे आणि बंडखोर आमदार एकनाथ शिंदे यांच्यात शिवसेना ताब्यात घेण्यावरून वाद सुरूच आहे. हे प्रकरण सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयापर्यंत पोहोचले आहे. दरम्यान, शिवसेनेने ‘सामना’ या मुखपत्रातून पुन्हा एकदा भाजपवर हल्लाबोल केला आहे. महाराष्ट्राचे तीन तुकडे करण्याचा कट भाजपने रचल्याचा आरोप होत आहे. या बंडाळीमागे भाजपचा हात असल्याचेही लिहिले आहे. शिंदे सध्या सुमारे ४० आमदारांसह गुवाहाटीमध्ये आहेत. ते म्हणाले की, त्यांच्या गटाने उद्धव ठाकरे सरकारला दिलेला पाठिंबा काढून घेतला आहे.

शिवसेनेतील बंडखोरीशी त्यांचा काहीही संबंध नाही, असे भाजपचे म्हणणे आहे. दुसरीकडे भाजपचे सरकार दोन दिवसांत येणार असल्याचे बोलले जात आहे. यात सत्य काय आहे? बंडखोर म्हणतात की आम्ही महाराष्ट्राच्या हितासाठी, हिंदुत्वासाठी भाजपसोबत जात आहोत, पण महामहिम, भाजपमुळे महाराष्ट्रावर ‘फूटने ‘ आणि ‘तुटण्याचे’ संकट आले आहे, यावर गुवाहाटीतील बंडखोर गटाचे प्रवक्ता अजून तोंड उघडत नाहीत.

- Advertisement -

त्यांना महाराष्ट्राचे तुकडे करायचे आहेत –

दिल्लीत बसलेल्या भाजप नेत्यांनी महाराष्ट्राचे तीन तुकडे करण्याचा धोकादायक कट रचला आहे. महाराष्ट्राचे थेट तीन तुकडे करायचे आहेत, मुंबई वेगळी करायची आहे आणि छत्रपती शिवरायांच्या या अखंड महाराष्ट्राचा नाश करायचा आहे, असे सामनाने लिहिले आहे.

- Advertisement -

शिवसेना आणि सरकारच्या बाजूने उभे राहणाऱ्यांचा दाबण्याचा प्रयत्न –

ईडीवर दबाव आणून आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे. महाराष्ट्र सरकार पाडण्याचा उद्योग नक्की कोण करतंय. या कटाचा पर्दाफाश झाल्यानंतरही बंडखोर त्यांच्या नावाने जय जयकार करत आहेत.  शिवसेना आणि सरकारच्या बाजूने उभे राहणाऱ्यांचा आवाज त्या लोकांना ‘ईडी’च्या जाळ्यात अडकवून दाबण्याचा प्रयत्न सुरू आहे. महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर हा खेळ किती दिवस चालणार.

दोन दिवसांत त्यांचेच सरकार येईल, बंडखोरांचे नाही –

शिवसेनेच्या म्हणण्यानुसार ज्यांना भारतीय जनता पक्षासोबत युती करायची आहे त्यांनी महाराष्ट्राचा स्वाभिमान एकदा तपासून पाहावा. दानवे म्हणतात त्याप्रमाणे येत्या दोन दिवसात राज्यात त्यांचेच सरकार येईल, बंडखोरांचे नाही. त्यासाठी ते घाईत आहेत, पण महाराष्ट्र हे पाप स्वीकारणार का?

Ajinkya Desai
Ajinkya Desaihttps://www.mymahanagar.com/author/ajinkyadesai/
मागील 4 वर्षापासून डिजिटल मिडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -