घरमहाराष्ट्रसंजय राऊत आले की लोक टीव्हीच बंद करतात, भुमरेंची खोचक टीका

संजय राऊत आले की लोक टीव्हीच बंद करतात, भुमरेंची खोचक टीका

Subscribe

संजय राऊतांनी पत्रकार परिषदेत बोलताना महाराष्ट्रात सत्तास्थापनेनंतर संदीपान भुमरेंनी आपल्यासमोर लोटांगण घातल्याचा दावा केला होता. यावर भुमरेंनी यांनी संजय राऊत आले की लोक टीव्हीच बंद करतात, अशी खोचक टीका केली आहे.

शिंदे गटाच्या बंडानंतर राज्यात सत्तापलाट झाला. त्याअनुषंगाने होणारे आरोप- प्रत्यारोप होत आहेत. आज सकाळी शिवसेना खासदार संजय राऊतांनी पत्रकार परिषदेत बंडखोर आमदार संदीपान भुमरे यांच्याबाबत केलेल्या दाव्यावरून चर्चा सुरू होती. दरम्यान भुमरे यांनी बोलताना हा दावा फेटाळून लावला असून भुमरे यांनी उलट संजय राऊतांनाच खुले आव्हान दिले आहे.

संजय राऊत काय म्हणाले –

- Advertisement -

संजय राऊतांनी पत्रकार परिषदेत बोलताना महाराष्ट्रात सत्तास्थापनेनंतर संदीपान भुमरेंनी आपल्यासमोर लोटांगण घातल्याचा दावा केला होता. संजय राठोड आदल्या दिवसापर्यंत माझ्यासोबत बसले होते. संदीपान भुमरे जेव्हा मंत्री झाले, तेव्हा सामना कार्यालयात येऊन प्रेमाने त्यांनी माझ्यासमोर लोटांगण घातले. साहेब तुम्ही होतात म्हणून हे सरकार आले आणि आम्ही मंत्री झालो असे ते म्हणाले. हवे तर त्याचे व्हिडीओ फुटेज काढायला लावतो. संजय राठोड यांच्यावरच्या संकटात उद्धव ठाकरे कसे ठामपणे उभे राहिले, हे सगळ्यांना माहिती आहे. ठीक आहे. जे बोलत आहेत, त्यांना बोलू द्यात. आमचे मन साफ आहे, असे संजय राऊत म्हणाले.

भुमरेंनी केली भूमिका स्पष्ट –

- Advertisement -

राऊतांच्या या विधानावर संदीपान भुमरेंनी भूमिका स्पष्ट केली आहे. ज्या वेळी सत्ता आली, मी मंत्री झालो, तेव्हा त्यांचे धन्यवाद मानण्यासाठी आमची भेट झाली. पण मी लोटांगण कशाला घेऊ? मी एक कार्यकर्ता आहे. ३५ वर्ष शिवसेनेसाठी झटलो. मंत्री झालो. मंत्री झाल्यानंतर फक्त आभार व्यक्त केले. लोटांगण घालण्याचा काही संबंध नाही, असे भुमरे म्हणाले.

संदीपान भुमरेंची संजय राउतांवर टीका –

मी काय लोटांगण घालणार आहे का? त्यांच्या बोलण्याकडे एवढे लक्ष देण्याचे कारण नाही. रोज तेच तेच सुरू आहे. लोकांनाही आता ते ऐकायचा वीट आला आहे. संजय राऊत टीव्हीवर आले की लोक आता टीव्हीच बंद करत आहेत, अशी परिस्थिती महाराष्ट्रात आली आहे. संजय राऊतांनीही आता शांत बसले पाहिजे, असा सल्ला त्यांनी राऊतांना दिला आहे.

संजय राऊत यांनी लोकांमधून निवडून येऊन दाखवावे, अशा शब्दांत भुमरेंनी राऊतांना आव्हान दिले आहे. टीका केली पाहिजे. पण कोणत्या पातळीवर जाऊन टीका करायची याला काही मर्यादा आहेत. आम्ही ३-४ लाख मतांनी निवडून आलो आहोत. आम्ही त्यांच्याप्रमाणे आयते निवडून आलेलो नाहीत. संजय राऊतांनी राजीनामा द्यावा आणि जनमतातून निवडून यावे. मग आम्ही त्यांना मानू. जनमतातून कसे निवडून यावे लागते हे त्यांना कळेल, असे भुमरे यावेळी म्हणाले.

Ajinkya Desai
Ajinkya Desaihttps://www.mymahanagar.com/author/ajinkyadesai/
मागील 4 वर्षापासून डिजिटल मिडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -