मुंबई विभागीय काँग्रेस समितीच्या अध्यक्षपदावरून पायउतार झाल्यापासून काँग्रेसमध्ये दुर्लक्षित राहिलेले माजी खासदार संजय निरुपम यांची प्रदेशात काँग्रेसच्या निवड मंडळात समावेश करून काँग्रेसने त्यांचे राजकीय पुनर्वसन केले आहे. काँग्रेस अलीकडेच प्रदेशाध्यक्ष म्हणून नाना पटोले यांची नियुक्ती केली. त्या पाठोपाठ राज्य निवड मंडळ गठीत करण्यात आले होते. या मंडळात एकनाथ गायकवाड आणि जनार्दन चांदूरकर या दोन माजी मुंबई अध्यक्षांचा समावेश करण्यात आला आहे.
संजय निरुपम, एकनाथ गायकवाड, जनार्दन चांदुरकर यांना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या पार्लमेंटरी बोर्डात स्थान देण्यात आलं आहे. मुंबई विभागीय काँग्रेस समितीच्या अध्यक्षपदावरून पायउतार झाल्यापासून माजी खासदार संजय निरुपम हे दुर्लक्षित राहिले होते. दरम्यान, महाराष्ट्र काँग्रेसमध्ये निवड मंडळात समावेश केला आहे. दरम्यान, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसमध्ये आणखी चार उपाध्यक्ष नेमण्यात आले आहेत. प्रदेश उपाध्यक्षपदी चारूलता टोकस, नाना गावंडे, संजय राठोड आणि सचिन नाईक यांची वर्णी लावण्यात आली आहे.