घरताज्या घडामोडीराज ठाकरेंच्या भोंग्याला पॉवर कुणाची?, खासदार संजय राऊतांचा टोला

राज ठाकरेंच्या भोंग्याला पॉवर कुणाची?, खासदार संजय राऊतांचा टोला

Subscribe

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी भाजपची मुंबईतील बुस्टर सभा आणि राज ठाकरेंच्या भोंग्यासंदर्भात टीका केली आहे. भोंगे हा विषय नाही, भोंग्यापेक्षा महत्त्वाचे विषय देशात आहेत. भोंग्यांना पॉवर कुणाची आहे हे देशाला माहिती आहे. हे हिंदुत्त्व नाही, कायद्याचा विषय आहे. कायद्याच्या चौकटीतील विषय आहे, असा टोला संजय राऊत यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना लगावला आहे.

राज ठाकरेंच्या भोंग्याला पॉवर कुणाची?

संजय राऊतांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले की, भोंगे हा विषय नाही, भोंग्यापेक्षा महत्त्वाचे विषय देशात आहेत. भोंग्यांना पॉवर कुणाची आहे हे देशाला माहिती आहे. हे हिंदुत्त्व नाही, कायद्याचा विषय आहे. कायद्याच्या चौकटीतील विषय आहे. सुप्रीम कोर्ट, न्यायालयल आणि पोलीस यांचा विषय आहे. तुम्हाला काहीचं काम नसल्यानं याविषयावर बोलत असाल तर हे राष्ट्रहिताचं नाही. राष्ट्रीय एकात्मतेला ते मारक आहे. भोंग्यामुळे कुणाला त्रास होऊ नये, यासाठी आम्ही आंदोलनं केली आहेत, लढाई केली आहे. त्यानंतर सुप्रीम कोर्टाने काही निर्णय दिले आहेत. या देशात जर कायद्याचं राज्य आहे. तर प्रत्येकानं कायद्याचं पालन केलं पाहीजे.

- Advertisement -

देवेंद्र फडणवीसांना इतक्या वर्षांनी फुलबाजे उडवायला काय झालं?

सीबीआयने केलेल्या तपासाची पानं या लोकांनी तपासावीत. केंद्रीय गुप्तचर खात्याचा अहवाल तपासावा. त्यामध्ये शिवसेना कुठे आहे, असे विचारणारे अज्ञानी लोकं आहेत सगळे, त्यांना कळेल की नक्की त्यावेळी शिवसेना कुठे होती आणि शिवसेना काय करत होती. राम मंदिर उभं राहतय. तसेच वातावरण बदललेलं आहे. प्रश्न बदललेले आहेत. अशा वेळी मूळ प्रश्नावरचं लक्ष दूर करण्यासाठी भाजपा नेते आणि त्यांचे गुप्त साथीदार याकडे सर्वांना आकर्षित करण्याचं काम करतायत.पण लोकं त्यामध्ये पडणार नाहीत. देवेंद्र फडणवीसांना इतक्या वर्षांनी फुलबाजे उडवायला काय झालं? असा सवाल राऊतांनी उपस्थित केला.

रामायण आणि रावणाचा इतिहास देवेंद्र फडणवीस यांनी वाचायला पाहिजे. रावण त्याच्या अहंकारामुळं मारला गेला. काही लोकांना सत्ता गेल्यामुळं अहंकार निर्माण होतो. विरोधी पक्षाच्या अंगात नेमका कशा प्रकराचा अहंकार संचारला आहे हे पाहावं लागेल, असं संजय राऊत म्हणाले.

- Advertisement -

…पण त्यांची मुलाखत लवकरच सामनामध्ये येईल

काल मुख्यमंत्र्यांनी मुलाखतीत महाराष्ट्राच्या विकासावर वक्तव्य केले नाहीत, असं विरोधी पक्षनेते फडणवीस म्हणाले असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता, संजय राऊत म्हणाले की, मला त्या मुलाखतीविषयी माहिती नाहीये. पण त्यांची मुलाखत लवकरच सामनामध्ये येईल. तेव्हा आपण बोलू, असं राऊत म्हणाले.


हेही वाचा : भोंग्यासंदर्भातील निर्णय राज ठाकरेंनी घ्यायचा नाही- गृहमंत्री दिलीप वळसे पाटील


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -