घरताज्या घडामोडीनेहरू सेंटरमध्ये खरगे-पवार यांच्यात शाब्दिक चकमक आणि अजित पवार दुसऱ्या दिवशी राजभवनावर

नेहरू सेंटरमध्ये खरगे-पवार यांच्यात शाब्दिक चकमक आणि अजित पवार दुसऱ्या दिवशी राजभवनावर

Subscribe

वर्षभरापूर्वीच्या सत्तानाट्याचा संजय राऊतांनी केला गौप्यस्फोट

वर्षभरापूर्वी राज्यातील सत्तानाट्य महाराष्ट्रासह संपूर्ण देशाने पाहिले. विद्यमान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपसोबत जाऊन राजभवनावर शपथविधीचा कार्यक्रम उरकला होता. मात्र, अजित पवारांनी असा तडकाफडकी निर्णय का घेतला? या सत्तानाट्यामागिल खरी कहाणी काय आहे? याबद्दल जाणून घेण्याची उत्कंठा सर्वांनाच आहे. वर्षभरापूर्वीच्या सत्तानाट्याचा गौप्यस्फोट शिवसेनेचे खासदार, सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी केला आहे. २२ नोव्हेंबर २०१९ रोजीच्या नेहरु सेंटरमधील त्या बैठकीतील चर्चेनंतर अजित पवार यांनी तडकाफडकी निर्णय घेतल्याचे स्पष्टीकरण राउत यांनी सामनातील रोखठोक या आपल्या सदरातून केले आहे.

नेहरू सेंटरमध्ये खरगे-पवार यांच्यात शाब्दिक चकमक

“नेहरू सेंटरमधल्या २२ नोव्हेंबरच्या वाटाघाटीत मल्लिकार्जुन खरगे यांच्या एका वक्तव्याने ठिणगी पडली. विधानसभेचे अध्यक्षपद कोणाकडे? अध्यक्षपद राष्ट्रवादीकडे जाता कामा नये अशी भूमिका खरगे वगैरे मंडळींनी घेतली. तेथे खरगे व शरद पवार यांच्यात शाब्दिक चकमक झाली. पवारांना इतके संतापलेले मी प्रथमच पाहिले. ते त्राग्याने टेबलावरचे कागद गोळा करून निघाले. त्यांच्या पाठोपाठ मी व प्रफुल पटेल धावत गेलो. त्याच बैठकीत सुरुवातीला आघाडीचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार उद्धव ठाकरे असतील हे श्री. पवार यांनीच सुचवले, पण खरगे, पवार चकमकीने बैठकीचा नूर पालटला. यानंतर श्री. अजित पवार हे बराच काळ त्यांच्या मोबाईल फोनवर खाली मान घालून ‘चॅटिंग’ करत होते. त्यानंतर तेही बैठकीतून बाहेर पडले. अजित पवारांचा फोन त्यानंतर ‘स्विच ऑफ’ झाला व दुसऱ्या दिवशी पहाटे त्यांचे दर्शन थेट राजभवनावरील शपथविधी सोहळ्यात झाले,”असा गौप्यस्फोट संजय राऊत यांनी सामनाच्या रोखठोक या सदरात केला आहे.

- Advertisement -

“फडणवीस-अजित पवारांचा शपथविधी सुरू असतानाच एक महत्त्वाचा फोन मला आला, ”तुमचे सरकार बनत नाही. फडणवीस-अजित पवार शपथ घेत आहेत. अजित पवारांनी एनसीपी फोडली. पक्ष आणि कुटुंबात फूट पडल्याचे सुप्रिया सुळे यांनी सोशल माध्यमांवर मान्य केले आहे.” मी त्याक्षणीही सांगितले, ”चार वाजेपर्यंत थांबा. अजित पवारांसोबत गेलेले परत येतील. स्वतः अजितदादाही गुदमरून परत फिरतील.” हे यासाठीच सांगायचे की, पहाटेच्या शपथविधीपूर्वी शरद पवार, अमित शहा यांच्यात दिल्लीत बैठक झाली अशा प्रकारच्या गौप्यस्फोट देवेंद्र फडणवीस अशी बैठक झाली व त्यात पहाटेच्या शपथविधीचे ‘नाटय़’ तयार झाले हे सर्वस्वी चूक आहे. अमित शहा यांच्या घरी एक बैठक झाली. त्यात एक बडे उद्योगपती व राष्ट्रवादीचे नेते असावेत. श्री. पवार या काळात दिल्लीत असताना त्यांच्यात व माझ्यात उत्तम संवाद होता व जवळ जवळ रोजच आम्ही भेटत होतो. नक्की कोठे काय सुरू आहे याचे ‘अपडेटस्’ एकमेकांना देत होतो. भारतीय जनता पक्षाशी कोणतेही डील करण्याच्या मनःस्थितीत मला श्री. पवार दिसले नाहीत. ”भाजपकडून सरकार बनविण्यासंदर्भात विविध स्तरांवरून ऑफर्स येत आहेत” हे त्यांचे सांगणे होते. ”लवकरच पंतप्रधान मोदी यांना भेटून मी भाजपबरोबर सरकार स्थापन करणे शक्य नाही असे सांगणार आहे” हे त्यांनी मला सांगितले. याच काळात शेतकऱयांच्या प्रश्नांवर पवार मोदींना भेटायला गेले व महाराष्ट्रातील सरकार स्थापनेबाबत सांगायचे ते सांगून आले. त्यामुळे पवारांनी भाजपला शब्द दिला होता व त्यानुसार पहाटेच्या हालचाली झाल्या हे खोटेच आहे. मोठे अपघात दुर्दैवाने पहाटे चालक साखरझोपेत असतानाच होतात!”

“असे एखादे सरकार येईल असा विश्वास जसा काँग्रेसला नव्हता तसा शिवसेनेच्या नवनियुक्त आमदारांनाही नव्हता. शरद पवार व माझ्यात ३५ दिवस सुरू असलेल्या गाठीभेटी हा निव्वळ टाईमपास आहे असा अपप्रचार सुरू झाला. १७ नोव्हेंबरला सकाळी पत्रकारांनी मला विचारले, ”तुमच्याकडे किती आमदारांचे पाठबळ आहे?” तेव्हा ”आमचा आकडा १७० आहे” असे मी सांगितले. त्या १७० आकड्याची खिल्ली उडवण्यात आली. तोपर्यंत सरकार स्थापनेसंदर्भात काँगेसचा स्पष्ट होकार आला नव्हता, पण अहमद पटेलांसारखे नेते सकारात्मक बोलत होते. मल्लिकार्जुन खरगे, पृथ्वीराज चव्हाण यांचे लक्ष सत्तेच्या वाटणीत राष्ट्रवादीला काय मिळत आहे यावरच होते,” असा खुलासा देखील संजय राऊत यांनी केला आहे.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -