घरताज्या घडामोडीकेंद्र सरकारने राजकारण बाजूला ठेवून भारतीयांकडे लक्ष द्यावे, राऊतांचा ऑपरेशन गंगावरुन पंतप्रधान...

केंद्र सरकारने राजकारण बाजूला ठेवून भारतीयांकडे लक्ष द्यावे, राऊतांचा ऑपरेशन गंगावरुन पंतप्रधान मोदींवर निशाणा

Subscribe

भाजपने उत्तर द्यावे दुसरं कोणी बोलल असतं तर भाजपचे नेते रस्त्यावर उतरले असते. भाजपने भूमिका घेणं गरजेचे असल्याचे संजय राऊत म्हणाले आहेत.

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचे कौतुक केलं आहे. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीकास्त्र डागलं आहे. भारताचे विद्यार्थी आणि लोक युक्रेनमध्ये अडकले असून निवडणूक असल्यामुळे ऑपरेशन गंगाचे ढोल वाजवत असल्याचे संजय राऊत म्हणाले. केंद्र सरकारने राजकारण बाजूला ठेवून युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांची मदत करावी असे संजय राऊत म्हणाले आहेत. तसेच राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी केलेल्या वक्तव्यावरुन संजय राऊत यांनी भाजपला उत्तर देण्याचे आवाहन केलं आहे. भाजपने भूमिका घेणं गरजेचे असल्याचे संजय राऊत म्हणाले आहेत.

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी एका खासगी वृत्तवाहिनीशी मुलाखत दिली आहे. यावेळी त्यांनी युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांबाबत चिंता व्यक्त केली आहे. आतापर्यंत जगात अनेक युद्ध झाली. इराकपासून अफगाणिस्तानपर्यंत पण अशा प्रकारे एखाद्या देशात हिंदुस्तानी समाज आणि हिंदुस्तानच्या विद्यार्थ्यांवर अशा प्रकारचे अत्याचार कधीच झाले नाही यासाठी एखाद्या देशाला दोष देत नाही. परंतु हा सरकारचे फेल्युर आहे. निवडणूक आले म्हणून ऑपरेशन गंगा करत आहेत. अशा प्रकारे देशातील मुले संकटात असताना निवडणुका प्रचार आणि पक्षाचा प्रसार करत असतील तर याला राष्ट्रीय बाणा म्हणत नाही.

- Advertisement -

युक्रेनमध्ये मुलांचे आणि पालकांचे आक्रोश पाहतो आहे. तिकडच्या बॉर्डरवर विद्यार्थ्यांना मारहण करण्यात येत आहे. त्यांच्याकडी अन्न, पैसे संपले आहेत. त्यांना येण्याचा मार्ग सापडत नाही आहे. सगळेच देशातील लोकं तिकडे अडकले आहेत. तरीही सरकारने राजकारण बाजूला ठेवून लक्ष घातलं पाहिजे.

राज्यपालांच्या वक्तव्यावर भाजपने भूमिका घेणं गरजेचे

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या गुरुंबद्दल मोठ वक्तव्य केलं आहे. यावर संजय राऊत म्हणाले की, भाजपने आता नवे व्याख्याते निर्माण केले आहेत. यावर भाजपने उत्तर द्यावे दुसरं कोणी बोलल असतं तर भाजपचे नेते रस्त्यावर उतरले असते. भाजपने भूमिका घेणं गरजेचे असल्याचे संजय राऊत म्हणाले आहेत.

- Advertisement -

हेही वाचा : राज्यपाल कोश्यारींच्या शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त विधानानं खळबळ

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -