घरताज्या घडामोडीमहाराष्ट्रात कायद्यानं काम चालतं; अर्णब गोस्वामींच्या अटकेनंतर संजय राऊतांची प्रतिक्रिया

महाराष्ट्रात कायद्यानं काम चालतं; अर्णब गोस्वामींच्या अटकेनंतर संजय राऊतांची प्रतिक्रिया

Subscribe

महाराष्ट्रात कायद्याने काम चालते, अशी प्रतिक्रिया रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांच्या अटकेनंतर शिवसेनेचे खासदार आणि प्ररवक्ते संजय राऊत यांनी दिली आहे. मुंबईचे आणि महाराष्ट्राचे पोलीस कोणावर अन्याय आणि सुडाने कारवाी करत नाहीत. कोणी गुन्हा केला असेल आणि तो दडपला असेल. त्यासंबंधी काही पुरावे पोलिसांना सापडले असतील त्यामुळे पोलिसांनी कारवाी केली असेल, असे संजय राऊत म्हणाले. अर्णब गोस्वामी यांच्यावरील कारवाईचा कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंध नाही.

“महाराष्ट्रात कायद्याने काम चालते. जर आमच्याकडून काही चुकले असेल तर कायदा आम्हालाही सोडणार नाही. मुंबई आणि महाराष्ट्राचे पोलीस कधीच कोणावर अन्याय करत नाहीत किंवा सूडाने कारवाई करत नाहीत. त्यामुळे जर कोणी गुन्हा केला असेल आणि तो दडपला असेल आणि त्यासंदर्भातील काही तपासाचे, पुराव्यांचे धागेदोरे हाती आले असतील तर पोलिसांनी कारवाई केली असेल. त्याच्याशी सरकारचा किंवा राजकीय पक्षाचा संबंध नाही,” असे संजय राऊत म्हणाले आहेत. “रिपब्लिकने आम्हा सर्वांविरोधात बदनामीची मोहीम चालवली होती. खोटे आरोप केले होते. खोटे आरोप होत असतील तर त्याचाही तपास झाला पाहिजे असे आम्ही म्हटले होते. आता कोण काय म्हणाले याचे स्पष्टीकरण मी देण्यासाठी आलेलो नाही,” असे यावेळी ते म्हणाले.

- Advertisement -

“पत्रकारितेसाठी हा काळा दिवस असल्याचे मला वाटत नाही. पत्रकारांनीही आपल्या मर्यादा पाळल्या पाहिजेत. तुम्ही कोणत्याही क्षेत्रात असताना मर्यादा पाळल्या पाहिजेत. सर्वोच्च न्यायालयाने त्या चॅनेलसंबंधी काय सांगितले आहे ते समजून घ्या. तुम्ही न्यायालय किंवा तपास यंत्रणा नाही. तुम्ही कोणाविरोधातही काहीही सांगून लोकांची दिशाभूल करु शकत नाही. सुप्रीम कोर्टाने हे निरीक्षण नोंदवले असताना त्यांनाही हा काळा दिवस आहे विचारणार का?,” असा सवाल संजय राऊत यांनी विचारला आहे.

“चुकीचं काम केलं नसेल तर मग तो पत्रकार, राजकीय नेता, अभिनेता कोणीही असो ओरडण्याचे कारण नाही. या देशात प्रसारमाध्यमांना सर्वात जास्त स्वातंत्र्य आहे. इतके स्वातंत्र्य कुठेच नाही. युपीमध्ये पत्रकारांवर कठोर कारवाई केली जाते त्याबद्दल कोणी बोलत नाही,” असे संजय राऊत म्हणाले.

- Advertisement -

हेही वाचा – अन्वय नाईक आत्महत्याप्रकरणी अर्णब गोस्वामी यांना अटक


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -