घरमहाराष्ट्र१७ ऑगस्टपासून शाळा सुरू !

१७ ऑगस्टपासून शाळा सुरू !

Subscribe

शहरांमध्ये ८ वी ते १२ वीचे वर्ग, ग्रामीण भागात ५ वी ते ७ वीचे वर्ग

मंगळवार, 17 ऑगस्टपासून राज्यात शाळा सुरू करण्यासंदर्भातील शासन निर्णय शालेय शिक्षण विभागाकडून जारी करण्यात आला आहे. राज्यातील कोरोना संसर्ग कमी झालेल्या भागातील निर्बंध शिथिल केल्यानंतर सरकारचा हा निर्णय महत्वाचा मानला जात आहे. राज्यातील ग्रामीण भागात 17 ऑगस्ट 2021 पासून इयत्ता 5 वी ते 7 वी चे वर्ग आणि शहरी भागात इयत्ता 8 वी ते 12 वी चे वर्ग सुरू करण्यास शासनाने परवानगी दिली आहे.

17 ऑगस्ट,2021 पासून राज्यातील ग्रामीण भागात इयत्ता 5 वी ते 7 वी चे वर्ग व शहरी भागातील इयत्ता 8 वी ते 12 वी चे वर्ग सुरू करण्यास परवानगी देण्यात येत असल्याचे शासन निर्णयात म्हटले आहे. शाळा सुरू करण्यासाठी महापालिका, नगरपालिका, ग्रामपंचायत स्तरावर समिती तयार करण्यात येतणार आहे. त्या समितीने शाळा सुरू करताना दक्षता घ्यायची आहे.

- Advertisement -

शाळा सुरू करण्यापूर्वी घ्यायची दक्षता
(i) शाळा सुरू करण्यापूर्वी कमीत कमी १ महिना संबंधित शहर अथवा गावात कोविडचा प्रादुर्भाव कमी असावा
(ii) शिक्षकांचे लसीकरण करणे आवश्यक
(ii) विद्यार्थ्यांच्या पालकांना शाळेच्या परिसरात मज्जाव
(३)एका बाकावर एकच विद्यार्थी
(४)दोन बाकांमध्ये ६ फूट अंतर, वर्गात जास्तीत जास्त १५-२० विद्यार्थी
(v) विद्यार्थी कोविडग्रस्त झाल्याचे आढळल्यास तात्काळ शाळा बंद

मुंबई, उपनगर आणि ठाणेचा निर्णय पालिका आयुक्त घेणार
मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे शहरातील कोविड परिस्थिती विचारात घेऊन शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्यासाठी महापालिका आयुक्त यांना प्राधिकृत करण्यात आले आहेत. कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, अहमदनगर, बीड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, पालघर या जिल्ह्यात कोविड परिस्थिती विचारात घेऊन शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्यासाठी जिल्हाधिकारी यांना प्राधिकृत करण्यात आले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -