घरताज्या घडामोडीराज्यात मविआचं सरकार असताना आपण किती दौरे केलेत, शंभुराज देसाईंचा आदित्य ठाकरेंना...

राज्यात मविआचं सरकार असताना आपण किती दौरे केलेत, शंभुराज देसाईंचा आदित्य ठाकरेंना सवाल

Subscribe

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दिल्ली दौरा करत असल्याने युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे सतत टीका करत असतात. आदित्य ठाकरे शिवसंवाद यात्रा काढत शिंदे गटावर निशाणा साधत आहेत. दरम्यान, आपण मंत्री असताना, राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असताना, आपण किती दौरे केलेत, असा सवाल माजी मंत्री शंभुराज देसाई यांनी उपस्थित केला.

राज्यात मविआचं सरकार असताना आपण किती दौरे केलेत

- Advertisement -

शंभुराज देसाई यांनी मुंबईत प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले की, राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असताना आदित्य ठाकरेंनी किती दौरे केले होते. याकडे त्यांनी प्रथम लक्ष द्यावे. महाविकास आघाडीचं सरकार गेल्यानंतर ५५ पैकी ४० आमदार एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली एकटवले आहेत. त्यामुळे शिवसैनिक पक्ष सोडून जात आहेत, हे पाहिल्यानंतर आदित्य ठाकरेंनी महाराष्ट्र दौऱ्याला सुरूवात केली आहे. ही चांगली गोष्ट आहे, असं शंभुराज देसाई म्हणाले.

मुख्यमंत्री दिल्लीला जात असतील तर…

- Advertisement -

मला आदित्य ठाकरे यांना नम्रपणे सांगायचे आहे की, महाराष्ट्रात इतर जिल्ह्यांमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे दौरे झाले, त्याकडेही कटाक्ष टाका. केवळ सरकारी बैठकांसाठी आणि कामासाठी मुख्यमंत्री दिल्लीला जात असतील तर, त्याच्यावर टीका करण्याचे कारण नाही, असे शंभुराज देसाई यांनी म्हटले.

मुख्यमंत्र्यांवर टीका करु नका

मातोश्रीची दारं सामान्य माणसांसाठी उघडी झाली आहेत. यावर आम्हाला काही बोलायचं नाही. पण एकनाथ शिंदेंना भेटण्यासाठी ग्रामीण भागातून लोक मुंबईत येत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज्यभरात सगळीकडे फिरत आहेत. त्यामुळे सोयीस्कररित्या मुख्यमंत्र्यांवर टीका करु नका, असेही शंभुराज देसाई यांनी म्हटले.


हेही वाचा : मला न बोलण्याचे आदेश, राज्यपाल भगतसिंह कोश्यारींचा


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -