घरमहाराष्ट्रवाईन विक्रीचे धोरण हा मागील सरकारचा उत्तम निर्णय, पण... - शरद पवार

वाईन विक्रीचे धोरण हा मागील सरकारचा उत्तम निर्णय, पण… – शरद पवार

Subscribe

मुंबई – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे नवे सरकार स्थापन झाल्यापासून महाविकास आघाडीचे नेते नव्या सरकारवर टीका करत आहेत. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी एका कार्यक्रमात बोलताना महाविकास आघाडी सरकारने घेतलेला वाईन विक्री निर्णय उत्तम होता, असे म्हटले आहे. शरद पवार द्राक्ष परिषदेत बोलत होते.

यावेळी वाईन विक्रीचे धोरण मागील राज्य सरकारने आणले तो उत्तम निर्णय होता. मात्र, काही कारणामुळे तो अंमलात आला नाही. आजही देशातील ६० टक्के जनता शेती करते. जगाची आणि देशाची लोकसंख्या पाहता, शेतकऱ्यांचा आकडा दुर्लक्ष करुन चालणार नाही. लोकसंख्या वाढत असताना शेतीवर बोजा किती टाकायचा याचा विचार केला पाहिजे, असे सांगत शेतकरी आणि त्यांच्या आत्महत्येचा मुद्दा आम्हाला अस्वस्थ करतो. अर्थकारण जर व्यवस्थित राहिले नाही तर कर्जाच्या बोज्याखाली शेतकरी आत्महत्येचा पर्याय अवलंबतो. ही परिस्थिती येऊ नये याबाबतचा आपण एकत्रितपणे विचार करायला हवा, असे शरद पवार म्हणाले.

- Advertisement -

प्रत्येक फळांची संघटना आपण केली आहे. पण द्राक्ष संघाने जे काम केले ते देशात कोणत्याच संघाने केल्याचे पाहिले नाही. आपण दोन वर्षानंतर भेटतो आहे. या दरम्यान अनेक संकटे आली. यात द्राक्ष बागायतदारांना मोठी किंमत मोजावी लागली. दोन वर्षे द्राक्ष निर्यातीला बंदी आली. चीनने निर्यातीच्या नियमात अटी टाकल्या. त्यानंतर ज्या मर्यादा आल्या, त्यामुळे द्राक्ष शेतकऱ्यांचे नुकसान झाले, असे शरद पवार म्हणाले.

Ajinkya Desai
Ajinkya Desaihttps://www.mymahanagar.com/author/ajinkyadesai/
मागील 4 वर्षापासून डिजिटल मिडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -