घरताज्या घडामोडीदीपक केसरकर म्हणतात आदित्य ठाकरे यांना अनुभव नाही; वाचा नेमके प्रकरण काय?

दीपक केसरकर म्हणतात आदित्य ठाकरे यांना अनुभव नाही; वाचा नेमके प्रकरण काय?

Subscribe

'आदित्य ठाकरेंना वयामुळे अनुभव नाही, रोज काहीतरी बोलून स्वतःचे हसे करुन घेणे योग्य नाही', असा टोला शिंदे गटाचे आमदार आणि मंत्री दीपक केसरकर यांनी लगावला. माजी मंत्री आणि शिवसेनेच्या ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर त्यांच्या दावोस दौऱ्यावरून निशाणा साधला आहे.

‘आदित्य ठाकरेंना वयामुळे अनुभव नाही, रोज काहीतरी बोलून स्वतःचे हसे करुन घेणे योग्य नाही’, असा टोला शिंदे गटाचे आमदार आणि मंत्री दीपक केसरकर यांनी लगावला. माजी मंत्री आणि शिवसेनेच्या ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर त्यांच्या दावोस दौऱ्यावरून निशाणा साधला आहे. “मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दावोस दौऱ्यात नेमके काय केले? याचा तपशील जाहीर करावा. मुख्यमंत्र्यांनी केलेल्या दावोस दौऱ्यात तब्बल ३५ ते ४० कोटींचा खर्च झाला”, अशी टीका आदित्य ठाकरेंनी केली होती. त्यावर आज दीपक केसरकर यांनी प्रत्युत्तर दिले.

बुधवारी सकाळी पत्रकार घेत मंत्री दीपक केसरकर यांनी आदित्य ठाकरे यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले. “आदित्य ठाकरे यांचे आरोप हास्यास्पद आहेत. आदित्य ठाकरे यांना वयामुळे अनुभव नाही, हे आम्ही समजू शकतो. म्हणून रोज काही तरी बोलायचे आणि स्वत:चे हसे करून घ्यायचे, हे योग्य नाही. आदित्य ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांच्याशी बोलावे, खात्री करून घ्यावी”, असा सल्ला देत दीपक केसरकर यांनी प्रत्युत्तर दिले.

- Advertisement -

“दावोसमध्ये जगभरातील लोक चार्टर्ड विमानाने येतात. चार्टर्ड विमानाने प्रवास केला म्हणजे फार मोठा गुन्हा केला, असे नाही. याआधी अनेक मुख्यमंत्र्यांनी चार्टर्ड विमानाने प्रवास केला. त्यामुळे आदित्य ठाकरे यांचे आरोप हास्यास्पद आहेत. तसेच, दावोस दौऱ्यासाठी मुख्यमंत्र्यांचे कमर्शियल विमानाचे तिकीट बूक करण्यात आले होते. दावोसमध्ये ३७ हजार कोटी रुपयांचे प्रकल्प महाराष्ट्रात येणार होते. अशा वेळी मुख्यमंत्र्यांनी अनुपस्थित राहणे, हे योग्य नव्हते. हा पंतप्रधानांचा अपमान ठरल असता”, असेही दीपक केसरकर यांनी सांगितले.

महाराष्ट्राचं राजकारण खालच्या पातळीवर

- Advertisement -

“मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे ७६ तास दावोसमध्ये होते. त्यावेळी ते केवळ चार तास झोपले. ७२ तास त्यांनी वेगवेगळ्या लोकांशी चर्चा केली. त्यांना भेटायला अनेक देशांचे प्रमुख आले होते. त्यालासुद्धा आदित्य ठाकरे यांच्याकडून हिणवण्याचा प्रयत्न करणयात आला. त्यावरून महाराष्ट्राचे राजकारण किती खालच्या पातळीवर गेले आहे, याचा विचार करावा”, अशी टीका केसरकर यांनी केली.


हेही वाचा – कसबा-चिंचवड पोटनिवडणुकीबाबत मुख्यमंत्री शिंदेंचे मोठं वक्तव्य; म्हणाले…

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -