घरदेश-विदेशराष्ट्रपती राजवट लागली तरी बेहत्तर

राष्ट्रपती राजवट लागली तरी बेहत्तर

Subscribe

शिवसेनेला मुख्यमंत्रीपद द्यायचे नाही ,भाजप हायकमांड ठाम

महाराष्ट्रातल्या सत्ता स्थापनेबाबत बुधवारी दिल्लीमध्ये भाजपच्या गोटात महत्त्वाच्या घडामोडी घडल्या. महाराष्ट्राचे निवडणूक प्रभारी भूपेंद्र यादव आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांच्यात बैठक झाल्याची सूत्रांची माहिती आहे, त्यानुसार शिवसेनेसोबत सकारात्मक चर्चा करायची मात्र राष्ट्रपती राजवट लागली तरी चालेल पण मुख्यमंत्रिपदावर कुठलीही तडजोड करायची नाही, असे आदेश भाजप हायकमांडने राज्यातील भाजप नेत्यांना दिले आहेत.

विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून आता १४ दिवस उलटले आहेत. मात्र अद्याप राज्यात सरकार स्थापन झालेले नाही. शिवसेना ५०-५० च्या फॉर्म्युल्यावर अडून आहे. शिवसेनेची अपेक्षा केवळ निम्म्या मंत्रीपदांची नसून त्यांना मुख्यमंत्रीपदही अडीच वर्षांसाठी हवे आहे. त्यामुळे राज्यातील भाजपची चांगलीच गोची झाली आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीत अमित शहा यांच्याशी चर्चा केली आहे.

- Advertisement -

शिवसेनेसोबत बाकी गोष्टींची चर्चा करण्याची तयारी आहे मात्र मुख्यमंत्रीपदासाठी हायकमांडचा स्पष्ट नकार आहे. या घडामोडींमध्ये वेळ आली तर राष्ट्रपती राजवट लागू करण्याची तयारी आहे; पण शिवसेनेला मुख्यमंत्रीपद दिले जाणार नाही. शिवाय सध्या महाराष्ट्रात नेतृत्व बदलाची जी चर्चा सुरु आहे, त्याला ही पूर्णविराम मिळाल्याचे दिसत आहे. कारण महाराष्ट्रामध्ये सरकारचे नेतृत्व देवेंद्र फडणवीस हेच करणार, देवेंद्र यांच्याच पाठीशी हायकमांड ठाम असल्याचं सूत्रांनी सांगितले.

भाजप एकट्याने सत्तास्थापनेचा दावाही करणार नाही. शिवसेनेशी सकारात्मक चर्चा झाल्यानंतरच हा सत्ता स्थापनेचा दावा केला जाईल, तोपर्यंत कुठलाही धोका पत्करला जाणार नाही असे देखील सूत्रांनी सांगितले. मग त्यासाठी वेळ लागला तरी बेहत्तर पण मुख्यमंत्रीपदासाठी तरी शिवसेनेसमोर झुकायचे नाही, असे भाजपच्या पक्षश्रेष्ठींचे म्हणणे आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -