शिवसेना-भाजपच्या युतीबाबत राजकीय वर्तुळातून तसंच सामान्य लोकांमधून संमिश्र प्रतिसाद उमटत आहेत. अशातच आता
‘त्या’ जवानांना ‘शहीद’ घोषित करा
पुलवामा दहशतवादी हल्ल्याबाबतही आंबेडकर यांनी आपले मत व्यक्त केले. पुलवामा हल्ल्यामध्ये ज्या जवानांना नाहक आपले प्राण गमावावे लागले, त्या जवानांना ‘शहीद’ घोषित करा, अशी मागणी त्यांनी यावेळी केली. ‘हल्ल्यात मरण पावलेले जवान जरी पॅरामिलिटरी फोर्सचे असले तरी सरकारने त्यांनी शहीद घोषित करावे, जेणेकरुन त्यांचे कुटुंबिय सुविधांपासून वंचित राहणार नाहीत, असं आंबेडकर यावेळी म्हणाले. सेमी आर्मी फोर्ससाठी कोणतेही कल्याण मंडळ नाही, त्यामुळे लष्कर कल्याण बोर्डाने त्यांची जबाबदारी घ्यावी, असंही ते म्हणाले. दरम्यान, ‘पुलवामा हल्ल्याची माहिती देशातील सर्व अधिकृत पक्षांच्या अध्यक्षांना गुप्तपणे देण्यात यावी. नाहीतर कुणाला तरी एकालाच याची माहिती दिल्यास, त्याचा राजकीय वापर होऊ शकतो,’ अशी टीकाही आंबेडकर यांनी यावेळी केली. प्रकाश आंबेडकर यांनी अन्य काही मुद्द्यांवरही यावेळी पत्रकारांशी संवाद साधला.