घरताज्या घडामोडीदेवेंद्र फडणवीस हे भविष्यात पंतप्रधान मोदींनाच चॅलेंज करतील; सुषमा अंधारेंचा टोला

देवेंद्र फडणवीस हे भविष्यात पंतप्रधान मोदींनाच चॅलेंज करतील; सुषमा अंधारेंचा टोला

Subscribe

गेल्या अनेक दिवसांपासून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे या राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारवर हल्लाबोल करत आहेत. अशातच त्यांना आता राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला.

गेल्या अनेक दिवसांपासून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे या राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारवर हल्लाबोल करत आहेत. अशातच त्यांना आता राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे भविष्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींनांच चॅलेंज करुन शकतात, तशी त्यांची वाटचाल सुरु आहे, अशा शब्दांत सुषमा अंधारेंनी फडणवीसांना टोला लगावला. तसेच, भाजपच्या नेत्यांकडून छत्रपती शिवाजी महाराजांचा वारंवार अवमान होत असताना त्यावर फडणवीस काहीही बोलत नसल्याचेही अंधारेनी यावेळी म्हटले. (shivsena leader sushma andhare criticism on dcm devendra fadnavis)

मुलुंडमधील ठाकरे गटाच्या महाप्रबोधन यात्रेत उपनेत्या सुषमा अंधारे बोलत होत्या. यावेळी त्यांनी देवेंद्र फडणवीसांवर टोलेबाजी केली. यावेळी त्या म्हणाल्या की, गुजरातमध्ये निवडणुका आल्या की, आपले उद्योग पळवले. कर्नाटकच्या निवडणुका लागल्या की त्यांनी महाराष्ट्रातील गाव पळवायला सुरुवात केली. जर अशाच पद्धतीने सुरु राहीले तर महाराष्ट्रासाठी आम्ही आहोत असे म्हणणारे फडणवीस कधी बोलणार? असा सवाल अंधारेंनी केला.

- Advertisement -

पुढे सुषमा अंधारे म्हणाल्या की, “उद्धव ठाकरेंना सत्तेतून दूर करण्यासाठी काही कपटी लोकांनी पाठीत खंजीर खुपसला. पण आम्हाला उद्धव ठाकरेंना पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेताना पाहायचे आहे”

काही जण म्हणतात सुषमा अंधारेंकडे आम्ही लक्ष देत नाही, लक्ष देत नाही तर एका दिवसात माझ्यावर पाच पाच कॅबिनेट मंत्र्यांना का बोलावे लागतं? असा सवाल अंधारेंनी यावेळी उपस्थित केला. सध्या महिलांचे प्रश्न ऐरणीवर असताना याबाबत देवेंद्र फडणवीस लक्ष घालत नसल्याचेही अंधारे यांनी सांगितले. भाजप Ed चा दुरुपयोग करुन एक एक पक्ष संपवण्याचा प्रयत्न करत आहे. भाजपला शिवसेना नाहीतर सर्वच पक्ष संपवायचे असल्याचे अंधारे म्हणाल्या.

- Advertisement -

याशिवाय, “विरोधी पक्ष संपवले गेले तर हुकूमशाही तयार होईल. या महाराष्ट्राची अस्मिता अबाधित ठेवण्यासाठी शिवसेना कायम लढत राहील असेही अंधारे म्हणाल्या. मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचा आणि सिंधुदुर्ग तोडून गोव्याला नेण्याचा, वेगला विदर्भ करण्याचा घाट काही लोकांनी घातला आहे”, असेही सुषमा अंधारे यांनी सांगितले.


हेही वाचा – मागण्या मान्य करा अन्यथा…, मुंबईतील रिक्षा चालकांचा बंदचा इशारा

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -