घरताज्या घडामोडीजय महाराष्ट्र ! शिवसैनिकांनो आता लढाई रस्त्यावर राहिलेली नाही

जय महाराष्ट्र ! शिवसैनिकांनो आता लढाई रस्त्यावर राहिलेली नाही

Subscribe

शिवसैनिकाची व्हायरल पोस्ट

शिवसेना संपविण्याचे आव्हान एक गुजराती माणूस महाराष्ट्रात येऊन देतो. म्हणूनच यापुढच्या काळात शिवसेनेची रणनिती बदलण्याची गरज एका शिवसैनिकांना पक्षातील कार्यकर्त्यांसमोर व्यक्त केले आहे. राणे यांनी मागील पंधरा वर्ष शिवसेना संपविण्याचा विडा उचलला होता. पण त्यांना काही जमलं नाही. म्हणून त्यांनी अमित शहा यांना आपल्या गावात बोलावून शिवसेना संपविण्याची सुपारी दिली.आणि म्हणून अमित शहा असे बोलले असतील, असं मला वाटले. जे शिवसैनिक आहेत त्यांना माझ एक सांगणे आहे की आताची लढाई ही रस्त्यावरची राहिलेली नाही, आता तुमचा सर्व विषयांचा अभ्यास दांडगा पाहिजे, तरच तुम्ही राजकारणात पुढच्या माणसाला गप्प करू शकता. अशा शब्दातच शिवसैनिकांना आगामी काळात सर्व पातळीवर संघर्ष करण्याचा संदेश एका शिवसैनिकाकडून व्हायरल करण्यात आलेला आहे.

देशाचे गृहमंत्री असणारे अमित शाह यांनी शिवसेना संपविण्याचे, हे वाक्य आहे ते त्यांनी नारायण राणे यांच्या कार्यक्रमात उच्चरले. एक गुजराती माणूस महाराष्ट्रत येऊन, मराठी माणसाच्या न्याय हक्का साठी जन्माला आलेल्या शिवसेनेला संपविण्याचे वाक्य बोलतो, आणि नारायण राणे सकट कार्यक्रमाला उपस्थित संपूर्ण मराठी जण या वाक्क्याला टाळ्या वाजवण्यासारखं मराठी माणसाच दुसरं दुर्दैव नसेल. आता शिवसेनेचे सर्वच विषय काही मराठी माणसाला भले पटत नसतील, पण 19जून 1966 साली जेव्हा शिवसेनेची स्थापना झाली,तेव्हा विशेष करून मुंबई आणि लगतच्या ठाणे परिसरात मराठी माणसाची परिस्थिती खूप वाईट होती. भाषांवार प्रांतरचने मुळे मुंबई मराठी माणसाला मिळावी,त्या साठी 105 मराठी माणसे हुतात्मे झाले.पण मुंबई ची आर्थिक नाडी त्या वेळेस परप्रांतीयांच्या हातात होती. मराठी माणसाकडे तेव्हा कोणतेच उद्योग नव्हते,चांगले शिक्षण नव्हते त्यामुळे सरकारी नोकरीत मराठी माणूस खालच्या पदावर काम करत होताआणि ही सर्व परिथिती बघून वंदनीय बाळासाहेब अस्वस्थ व्हायचे आणि त्यातून जी क्रांती झाली, त्याच नाव शिवसेना. तो शिवसेनेचा सर्व इतिहास आपणा सर्वाना माहीतच आहे. आणि तेव्हा शिवसेना आणि फक्त शिवसेनाच मराठी माणसाच्या पाठीशी खंबीर होती, म्हणून आज मराठी माणूस मुंबई शहरात ताठ मानेने उभा आहे, हे कोणीही नाकारू शेकत नाही. आता पिढी बदलत आहे, पण इतिहास मात्र बदलत नसतो.

- Advertisement -

जय महाराष्ट्र !!
बाळासाहेबांचा एक शिवसैनिक…

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -