घरताज्या घडामोडीशिवसेनेच्या नेत्यांना बुद्धिदोष झाला; आशिष शेलारांचा राऊतांवर हल्लाबोल

शिवसेनेच्या नेत्यांना बुद्धिदोष झाला; आशिष शेलारांचा राऊतांवर हल्लाबोल

Subscribe

संजय राऊत तुम्ही देवेंद्र फडणवीसांवर स्वप्नदोष झाल्याचा आरोप करत असाल तर शिवसेनेच्या नेत्यांना बुद्धीदोष झाला आहे. या बुद्धीदोषाचे उत्तर ठाण्याला आहे

बाबरी पाडली तेव्हा शिवसेना कुठे होती असं कोणी विचारत असेल तर त्यांनी त्यांच्याच पक्षातील नेते सुंदरसिंह भंडारी यांना विचारावं. त्या काळातील सीबीआयचा अहवाल तपासा. सीबीआयने तपास केला आहे. सीबीआयाने केलेल्या तपासाची पानं आणि केंद्रीय गुप्तचर खात्याचा अहवाल तपासावा. शिवसेना कुठे आहे असं विचारणाऱ्या अज्ञानांना शिवसेना कुठे होती आणि काय करत होती हे कळेल अशी टीका शिवसेना खासदार संजय राऊत यांनी विरोधी पक्षनेते देवेद्र फडणवीस यांच्यावर केली. शिवाय मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी ‘फडणवीसांना विचीत्र स्वप्नदोष आहे’ असं म्हणत हल्लाबोल केला. राऊतांच्या या टीकेवर आता भाजपा आमदार आशिष शेलार यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

मुंबईत पत्रकार परिषदेत बोलताना आशिष शेलार यांनी संजय राऊत यांच्यावर टीका करत प्रत्युत्तर दिले आहे. “संजय राऊत तुम्ही देवेंद्र फडणवीसांवर स्वप्नदोष झाल्याचा आरोप करत असाल तर शिवसेनेच्या नेत्यांना बुद्धीदोष झाला आहे. या बुद्धीदोषाचे उत्तर ठाण्याला आहे. तिथे संजय राऊत यांनी जाऊन यावे”, असा टोला आशिष शेलार यांनी संजय राऊतांना लगावला आहे.

- Advertisement -

“हे आंदोलन साधू संतानी, हिंदू समाजाने सुरु केल्याचे अख्ख्या जगाला माहिती आहे. तुमचा जन्मच १९६० नंतरचा आहे आणि हे आंदोलन त्याआधी सुरु झाले. जन्म होण्याआधी मी कारसेवेला होतो म्हणणाऱ्यांनी आधी आत्मपरिक्षण करावं. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्व हिंदू परिषद ही नावं तरी माहिती आहेत का यांना. उगाच श्रेय घेण्याच्या भानडीत ही गडबड करु नका. आज बोलणाऱ्यांनी तोंड बंद करावीत.”

“हनुमान चालिसाचा विषय भाजपाचा नाही आणि पेट्रोलच्या विषयावर भाजपानेच काम केले आहे. भाजपाच्या सरकारने देशात पेट्रोलच्या करात सवलत दिली आहे याची पंतप्रधांनी आठवण करुन दिली मग त्यावेळी पळ का काढता? काँग्रेस त्यावेळी आंदोलन करत होती मग त्यांनी आता स्वतःच्या सरकारला सांगावे की कर कमी करावे. जगामध्ये युद्ध सुरु असतानाही कोणत्याही दबावाला बळी न पडता पंतप्रधानांनी रशियाकडून क्रुड ऑईल घेतले. त्याबद्दल तुम्ही एकतरी वाक्य काढलं का? तुमच्या डोक्यात राजकारणाची घाण आहे ती आधी साफ करा”, असं आशिष शेलार म्हणाले.

- Advertisement -

मुंबईत रविवारी महाराष्ट्र दिनानिमित्त सोमय्या मैदानावर जाहीर सभा घेऊन भाजपाने जोरदार शक्तिप्रदर्शन केले. या सभेत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व शिवसेना यांनाच लक्ष्य केले. बाबरी पाडली तेव्हा मी तेथे होतो असे म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंवर हिंदूत्वाच्या मुद्यावरून जोरदार टीका केली. यावर शिवसेना कुठे आहे असं विचारणाऱ्या अज्ञानांना शिवसेना कुठे होती आणि काय करत होती हे कळेल,” असं प्रत्युत्तर शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांनी दिलं आहे.


हेही वाचा – राज ठाकरेंच्या भोंग्याला पॉवर कुणाची?, खासदार संजय राऊतांचा टोला

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -