घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रशोध बेपत्ता मुलींचा : धक्कादायक! नाशिक शहरातून ४ महिन्यात ६३५ तरुणी गायब;...

शोध बेपत्ता मुलींचा : धक्कादायक! नाशिक शहरातून ४ महिन्यात ६३५ तरुणी गायब; २३१ अल्पवयीन मुलीही बेपत्ता

Subscribe

नाशिक : राज्यातील महिला आणि मुलींच्या बेपत्ता होण्याच्या प्रमाणात वाढ झाल्याची बाब पुढे आली असतांनाच नाशिक शहरात जानेवारी ते ८ मे २०२३ या कालावधीत तब्बल ९५६ मुली व महिला बेपत्ता झाल्याची धक्कादायक नोंद पोलीस आयुक्तालयाकडे झाली आहे. ‘माय महानगर’च्या हाती आलेल्या माहितीनुसार, ९५६ पैकी २२१ अल्पवयीन मुली आहेत. तर १८ वर्षांपुढील महिला तब्बल ७३५ आहेत.

पोलिसांना अवघ्या ३१ अल्पवयीन मुलींचा शोध लागला आहे. उर्वरित बेपत्ता मुली व महिलांचा शोध अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष (अॅण्टी ह्युमन ट्रॅफिक युनिट), मध्यवर्ती गुन्हे शाखेसह पोलीस ठाणेनिहाय पोलीस अधिकारी व कर्मचारी घेत आहेत. राज्यात दिवसेंदिवस मुली आणि महिलांची बेपत्ता होण्याच्या संख्येत वाढ असल्याचे राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी दोन दिवसांपूर्वीच स्पष्ट केले. राज्यात मार्च महिन्यात तब्बल २ हजार २०० मुली बेपत्ता झाल्या आहेत.

- Advertisement -

फेब्रुवारीच्या तुलनेत मार्च मध्ये ३९० ने वाढ झाली आहे. राज्यात दररोज सरासरी ७० मुली बेपत्ता होत असून, बेपत्ता होणाऱ्या मुली १८ ते २५ वयोगटातील आहेत, असेही त्यांनी म्हटले आहे. धार्मिक शहर म्हणून ओळख असलेल्या नाशिकमध्येही बेपत्ता होणाऱ्या मुली आणि महिलांच्या संख्येतही लक्षणीय वाढ होत असल्याची बाब ‘माय महानगर’ च्या हाती आली आहे. केवळ शहराचा आढावा घेतला तरी बेपत्ता झालेल्या मुली आणि महिलांचे धक्कादायक प्रमाण समोर येते. बेपत्ता झालेल्या मुली अल्पवयीन असतील तर पोलीस अपहरणाची नोंद केली जाते. मुली अल्पवयीन असल्याने त्यांची ओळख जाहीर केल्या जात नसल्याने त्याची स्वतंत्र नोंद पोलिसांच्या संकेतस्थळावर नाही. मात्र, सज्ञान मुलींच्या बेपत्ता झाल्याची नोंद पोलिसांच्या संकेतस्थळावर आहे.

बेपत्ता मुली व महिलांच्या नातेवाईकांनी नाशिक शहर पोलिसांनी बेपत्ता झाल्याच्या तक्रारी केल्या आहेत. घराची प्रतिष्ठा धुळीस मिळू नये, यासाठी अनेक मुलींचे कुटुंबियांनी पोलीस ठाण्याला तक्रार देण्याचे टाळत असल्याचेही समोर आले आहेत. यापैकी काही तरुणी आणि महिला लग्न करून घरी परतल्या आहेत. ज्या महिला आता घरी परतल्या आहेत, त्या स्वतंत्र जीवन जगू इच्छित होत्या. त्यामुळे त्यांनी घर सोडण्याचा निर्णय घेतल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. अनेक महिलांना घरातील रुढी, परंपरा मान्य नसल्याने, त्यांनी हा मार्ग स्वीकारल्याचेही सांगण्यात येत आहे. मात्र, ज्या मुली आणि महिला घरी परतल्याच नाही, त्यांचा अद्याप पावेतो कोणताही ठावठिकाणा लागलेला नाही. त्यामुळे चिंतेत भर पडली आहे.

ही आहेत कारणे
  • प्रेमप्रकरण
  • कौटुंबिक कलह
  • सोशल मीडियाचा अतिवापर
  • प्रियकराकडून लग्नाचे अमिष
  • विवाहबाह्य संबंध
  • पतीसह सासरच्यांकडून होणारा छ
  • नवऱ्याची नोकरी गेली
  • वय वाढल्यानंतही लग्न होत नाही.
  • आर्थिक अडचण,
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -